वृत्तसंस्था
जयपूर : राजस्थानात रविवारी (ता.२६ ) होणाऱ्या शिक्षक भरती परीक्षेतील कॉपी टाळण्यासाठी सरकारने आज इंटरनेट सेवा, एसएमएस आणि एमएमएसवर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. Internet in five districts of Rajasthan shut down today to prevent cheating in teacher recruitment exams!
राजस्थानातील पाच जिल्ह्यात राजस्थान शिक्षक भरती परीक्षा घेण्यात येत आहे. सकाळी दहा ते दुपारी अडीच या काळात दोन सत्रात ही परीक्षा पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल आहे.
परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी इंटरनेट सेवा, एसएमएस आणि एमएमएसवर पहाटे ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश कंपन्याना दिले आहेत. मात्र संभाषणावर बंदी घातलेली नाही. राज्यातील अजमेर, अलवार, दौसा, झुनझुन आणि जयपूर जिल्ह्यात ही परीक्षा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App