विशेष प्रतिनिधी
नारनौल (वृत्तसंस्था) : शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यास भाजप सरकार कटिबद्ध आहे. परंतु, ते रद्द केल्यास मी राजकारणच सोडून देईन, असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले. haryana CM manoharlal khattar says Will certainly give MSP farmers
हरियाणातील नारनौल येथील जाहीर मेळाव्यात बोलताना शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला. खट्टर म्हणाले की, जर कोणी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर राजकारण सोडून देईन. “एमएसपी नेहमीच राहील. जर कोणी हे रद्द करण्याचा प्रयत्न केला तर मनोहर लाल खट्टर राजकारण सोडतील. एमएसपी संपणार नाही, ”ते म्हणाले, “एमएसपी पूर्वी होता, तो आता अस्तित्त्वात आहे आणि भविष्यातही राहील.” haryana CM manoharlal khattar says Will certainly give MSP farmers
शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर खट्टर यांचे हे विधान समोर आले आहे. “या समस्येवर तोडगा (शेतक चर्चेच्तून शोधायला हवा. हा मुद्दा लवकरच सोडविला जावा, असे मी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, केंद्र सरकार नवीन शेती कायद्याच्या कलमाशी संबंधित त्यांच्या मुद्द्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे.
खट्टर म्हणाले की, केंद्र आणि शेतकरी संघटनांमधील चर्चाची आणखी एक फेरी होऊ शकते, परंतु तोमर यांनी निषेध नोंदवणाऱ्या शेतकर्यांच्या संघटनांनी त्या तीन कृषी कायद्यांविषयी “शंका” व्यक्त करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की विशिष्ट विषयांवर चर्चा होणे आवश्यक होते आणि त्यांच्या तक्रारींकडे सध्या “स्पष्टतेचा अभाव” आहे. शेतकऱ्यांना चर्चेची तारीख निश्चित करवी,असे आवाहन त्यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App