विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शंभर वर्षांपूर्वी २ ऑक्टोबर रोजी एक असे महात्मा जन्माला आले की ज्यांनी भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी दिलेली शिकवण आज जगातील अनेक जणांना प्रेरणा देत आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला . आफ्रिकेत असताना तेथील भारतीयांशी उडाला भेदभाव आणि अस्पृश्य देशी गांधीजींनी लढा दिला. भारताला आयुष्याच्या मार्गाने त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले.
These 5 heroes are building the nation Mahatma Gandhi dreamt of
आजही अनेक लोक त्यांनी केलेल्या कार्याची तसेच त्यांनी दिलेल्या शिकवणीची प्रेरणा घेऊन कार्य करीत आहेत. गांधीजींच्या आयुष्याची प्रेरणा घेऊन तसेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून हे आठ हिरो भारताच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. तर आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Washington : Mahatma Gandhi’s statue outside the Indian Embassy in Washington DC desecrated by unruly elements of #BlackLivesMatter protesters.
१: पोपटराव पवार: १९८९ साली महाराष्ट्रातील हिवरे बाजार या गावाचे सरपंच पोपटराव पवार यांनी त्यांच्या गावाचे रूपांतरण हायेस्ट ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये केले. पोपटरावांनी या दुष्काळग्रस्त गावमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम चालू केली. त्याचबरोबर त्यांनी दारूच्या वापरावर बंदी, पर्यावरण विकास यंत्रणा, तसेच कुटुंब नियोजन योजना सुरू केली. मागील वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
२: परमिता शर्मा आणि माझीन मुक्तर: परमिता आणि माझी हे दोघे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाला वंचित असलेल्या मुलांसाठी मोफत शाळा चालवतात. त्यांच्या शाळेतील 110 विद्यार्थी हे आजूबाजूचे प्लास्टिक गोळा करून ते ट्युशन की म्हणून जमा करतात. या उपक्रमातून हे उभयता नॉन बायोडिग्रेडेबल संसाधनांचे रिसायकलिंग करतात.
३: गंगाधर आणि व्यंकटेशवरी कटनम: तेलंगणामधील हे वृद्ध दांपत्य आपल्या पेन्शनमधील पैशातून तेलंगणामधील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे काम करत आहेत. गेली अकरा वर्षे ते हे काम करीत आहेत व सोशल मीडियावर त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सेवेचे कौतुक होत आहे.
४: दिपेश टंक: आपण आपल्या आजूबाजूला समाजामधील छेडछाड आणि विनयभंगाच्या घटना आपण सतत ऐकत असतो. त्यामुळे स्त्रियांना खूप त्रास होत असतो. यावर दिपेश टंक नावाच्या तरुणाने वेगळाच उपाय काढला आहे. त्याने एचडी कॅमेरा असलेल्या चष्म्याचा जोडीमध्ये पैसे गुंतवले व तो लोकलमधील अशा घटनांचे या चष्म्याने रेकॉर्डिंग करीत असे. २०१३ मध्ये ९ मित्रांसह चालू केलेली ही मोहीम ‘Warr’ असे नाव देण्यात आले आहे. (वार अगेन्स्ट रेल्वे रावडीस) आता त्याच्या बरोबर जवळजवळ ४० पोलीस अधिकारी त्याच्याबरोबर काम करत आहेत. दिपेशला स्त्रियांबद्दल खूप आदर आहे व त्याच्या आईने तिला शिकवणीनुसार तो हे कार्य करत आहे.
५: बेझवाडा विल्सन: बेजवडा विल्सन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे. डोक्यावरून मैला नेण्याच्या पर्थेचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी मोहीम चालवली होती. मानवी मैला डोक्यावर घेऊन जाण्याच्या विरोधात त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे १९९३ मध्ये या प्रथेवर बंदी घालण्यात आली. १९९४ मधे पॉल दिवाकर व एस आर शंकरन यांच्या सहकार्याने त्यांनी ही संस्था सुरू केली.
अशाप्रकारे भारतामध्ये अजूनही अनेक समाजासाठी जीवन वेचणारे अनेक कार्यकर्ते आहेत. गांधीजींच्या प्रेरणेने असे अनेक लोक देशामध्ये काम करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App