प्रतिनिधी
वायनाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अपमान केला आहे, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणाचा संदर्भ देत राहुल म्हणाले- माझ्या नावामागे गांधी का आहे, नेहरू का नाही? हा माझा अपमान आहे. राहुल म्हणाले की, भारतात वडिलांचे आडनाव वापरले जाते. कदाचित मोदींना हे माहिती नसेल.Rahul Gandhi Vs PM Narendra Modi, Nehru surname Issue, Congress Latest News, BJP, Waynad
केरळमधील आपला लोकसभा मतदारसंघ वायनाड येथे एका सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींचे नाव तोंडावर आणत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभा आणि लोकसभेत आपला मुद्दा मांडतात, पण एकदाही अदानीचं नाव घेत नाही. याचा अर्थ सरकार या दलदलीत चांगलेच अडकले आहे. सरकार तपासापासून का पळत आहे?
माझ्या अपमानाने काहीही होणार नाही
राहुल म्हणाले की, पंतप्रधान स्वत:ला खूप शक्तिशाली समजतात. त्यांना वाटते की प्रत्येकजण त्यांना घाबरेल, परंतु त्यांना कदाचित माहिती नसेल की मोदी मला भीती वाटणारी शेवटची व्यक्ती असेल. मी संसदेत जे काही बोललो ते खरे होते आणि त्यामुळे माझ्या मनात कोणतीही भीती नव्हती. माझा अपमान करून काहीही होणार नाही. सत्य समोर येईलच.
राहुल म्हणाले, माझ्या चेहऱ्याकडे बघा आणि ते बोलतात तेंव्हा त्याच्याकडे बघा. बोलता बोलता त्यांनी किती वेळा पाणी प्यायले ते पाहा. पाणी पितानाही हात थरथरत होते. संसदेच्या कामकाजातून माझ्या भाषणाचा काही भाग काढून टाकण्यात आला, पण पंतप्रधानांचे शब्द काढले गेले नाहीत. मी कोणाचा अपमान केला नाही. मी जे बोललो त्याबाबत मला पुरावे दाखवण्यास सांगितले होते आणि मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे, ज्यात पुराव्यासह प्रत्येक मुद्दा स्पष्ट केला आहे.
मी फक्त काही तथ्ये मांडली
या देशातील प्रत्येकाने संसदेचे कामकाज पाहणे, देशात काय चालले आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान आणि अदानी यांच्यातील संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे. राहुल म्हणाले- काही दिवसांपूर्वी मी आमचे पंतप्रधान आणि अदानी यांच्यातील संबंधांवर संसदेत भाषण केले होते. मी माझा मुद्दा अतिशय सभ्य भाषेत आणि आदरपूर्वक ठेवला. मी कोणतीही वाईट भाषा वापरली नाही, कोणाला शिवीगाळ केली नाही, मी फक्त काही तथ्ये मांडली.
अदानींसाठी नियम बदलले
मी फक्त एवढंच सांगितलं की, अदानी पंतप्रधानांसोबत परदेशात कसा प्रवास करतात आणि त्यानंतर लगेचच त्यांना या देशांमध्ये कंत्राटं कशी मिळतात. अदानींना हे विमानतळ मिळावेत म्हणून नियम कसे बदलले ते मी सांगितले. यापूर्वी ज्यांना विमानतळ चालवण्याचा अनुभव नव्हता, ते अर्ज करू शकत नव्हते, परंतु अदानी या प्रक्रियेत समाविष्ट करण्यासाठी नियम बदलण्यात आले.
नीती आयोग आणि इतर संस्थांनी यावर भाष्य केले आणि सांगितले की त्यांना परवानगी देऊ नये, परंतु तरीही त्यांना परवानगी देण्यात आली. श्रीलंकेत एका जनसुनावणीदरम्यान एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान मोदींनी बंदराचे कंत्राट देण्यासाठी अदानींवर दबाव आणला होता.
अदानी आणि पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जातात आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अदानीला खाण प्रकल्पासाठी काही अब्ज डॉलर्सचे कर्ज देते. माझ्या भाषणानंतर माझ्या बहुतेक भाषणाची संसदेच्या रेकॉर्डमध्ये नोंद झाली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App