विशेष प्रतिनिधी
लखनऊ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज लखिमपूरमध्ये पोहोचल्या आहेत. तेथे झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या आहेत. Priyanka Gandhi in Lakhimpur, yet Akhilesh Yadav’s Samajwadi Vijay Yatra in Twitter trending
प्रियंका गांधी यांना स्टेजवर येऊ दिले जाणार नाही, असे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केल्यानंतर देखील प्रियांका गांधी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सारख्या तेथे पोहोचल्या आणि त्यांनी श्रद्धांजली सभेत सहभाग घेतला. त्या स्टेजवर बसल्या नाहीत तर शेतकऱ्यांमध्ये पहिल्या रांगांमध्ये खाली बसल्या. त्याचे फोटो एएनआय सारख्या वृत्तसंस्थेने देखील ट्विटरवर शेअर केलेत.
Congress leader Priyanka Gandhi Vadra attends the 'antim ardas' of farmers who were killed in the October 3 Lakhimpur Kheri violence. pic.twitter.com/4TCpahQCOV — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 12, 2021
Congress leader Priyanka Gandhi Vadra attends the 'antim ardas' of farmers who were killed in the October 3 Lakhimpur Kheri violence. pic.twitter.com/4TCpahQCOV
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 12, 2021
एकीकडे प्रियांका गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा राजकीय दृष्ट्या तापवत ठेवलेला असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी विजय यात्रेवर निघाले आहेत. त्यांनी आज कानपूरमध्ये मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. सध्या समाजवादी विजय यात्रा ट्विटरवर टॉप टेन मध्ये ट्रेंडिंगला दिसते आहे. प्रियांका गांधी यांनी राजकीय दृष्ट्या पुढे येण्याचा प्रयत्न क करीत असल्या अखिलेश यादव हे ट्विटर सारख्या सोशल मीडियात त्यांच्यापेक्षा पुढे असल्याने उत्तर प्रदेश मधला राजकीय कल या दोन नेत्यांच्या स्पर्धेत सध्या नेमका कोणाकडे आहे हे सर्वसाधारणपणे दिसून येत आहे.
Samajwadi Party leader Akhilesh Yadav addresses a rally in Kanpur amid a large gathering of supporters. pic.twitter.com/f9Qz3rD28y — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 12, 2021
Samajwadi Party leader Akhilesh Yadav addresses a rally in Kanpur amid a large gathering of supporters. pic.twitter.com/f9Qz3rD28y
अखिलेश यादव यांनी लखीमपूरला भेट दिली असली तरी त्यांनी आपले सगळे लक्ष संपूर्ण उत्तर प्रदेश यावर केंद्रित केले आहे, तर प्रियांका गांधी यांनी आपले लक्ष अद्यापही लखीमपूर हिंसाचाराला भोवतीच केंद्रीत ठेवले आहे परंतु त्याचे प्रतिबिंब मात्र सोशल मीडियावर अपेक्षेप्रमाणे पडताना दिसत नाही. कारण ट्विटरवर टॉप टेन मध्ये प्रियांका गांधी यांनी उचलून धरलेला लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा दिसत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App