विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विरोधक वार करत राहिले आणि मोदी काम दाखवत राहिले…!! अशी गेल्या दोन आठवड्यातली राजधानी दिल्लीतली राजकीय कहाणी आहे.विरोधकांनी एकही दिवस संसदेचे कामकाज गोंधळाविना पार पडू दिले नाही. पेगासस हेरगिरी आणि कृषी विधेयकांच्या मुद्द्यांवरून सर्व विरोधक सरकारवर प्रहार करत राहिले, पण ते सगळे त्यांच्याच गदारोळामुळे वाया गेले.Opposition attack on modi government turned in vain as PM Modi remained in public contact through his government programs
मोदी सरकारला साधी खरोचही आली नाही. उलट विरोधक या संपूर्ण पंधरवड्यात स्वतःच्या राजकीय कर्तृत्वाने exposed झाले. लोकशाही वाचवण्याचा धोशा त्यांनी लावला पण तो संसदेबाहेर. प्रत्यक्ष संसदेत राज्यसभेतल्या टेबलवर ते नाचलेले जनतेला दिसले.
उलट पंतप्रधान मोदी मात्र आपले नियोजित काम करत राहिले. नियोजित कामाची त्यांची निवड देखील अशी चपखल होती की विरोधक संसदेत काय करताहेत?, ते गोंधळ घालून कसे exposed होत आहेत ना? ते परस्पर घडते आहे ना?, एवढेच बघून मोदी आपल्या कामाकडे वळत होते.
मोदींची कामे
विरोधक संसद बंद पाडत असता मोदींनी हे करून दाखवले आहे. संसद चालू असो अथवा नसो मोदींनी सरकारच्या ठाम भूमिकेत तडजोड केली नाही. जनता संपर्कात त्यांनी कोठेही अडथळा आणू दिला नाही. उलट संसद बंद पडत राहिल्यामुळे विरोधकांची प्रतिमा डागाळत राहील, हेच त्यांनी अप्रत्यक्ष रीतीने पाहिले. यातून विरोधकांनाही राजकीयदृष्ट्या तर काही साध्य करता आले नाहीच, पण मोदी सरकारच्या अंगावरचे सगळे वार वाया गेलेले दिसले…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App