वृत्तसंस्था
लखीमपूर : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या लखीमपूर दौऱ्यात पीडित शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकार रमण कश्यप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेथेच त्यांनी आपण उपोषणाला बसण्याची घोषणा केली.Navjot Singh Sidhu’s fast and silence in Lakhimpur
लखीमपूर मधल्या हिंसाचारात केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा ट्रेनिंग यांचा मुलगा अमित मिश्रा सामील आहे. तो जोपर्यंत हिंसाचाराच्या तपासात चौकशीला सामोरा जात नाही, तोपर्यंत आपण येथे उपोषण सुरू करणार आहोत आणि इथून पुढे मौनव्रत पाळणार आहोत. त्यामुळे पत्रकारांशी बोलताना येणार नाही, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी जाहीर केले.
नवज्योत सिंग सिद्धू लखीमपूर मध्ये ठाण मांडून बसले आहेत. त्याआधी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी येथे येऊन स्वतंत्रपणे पीडित शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले.
जब तक मिश्रा जी(अजय मिश्रा टेनी) के बेटे आशीष के ऊपर कार्रवाई नहीं होती, वो जांच में शामिल नहीं होता, मैं यहां भूख हड़ताल पर बैठूंगा। इसके बाद मैं मौन हूं कोई बात नहीं करूंगा: नवजोत सिंह सिद्धू, लखीमपुर हिंसा मामले में दिवंगत पत्रकार रमन कश्यप के परिवार से मुलाकात के बाद pic.twitter.com/uXyUobSnSK — ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2021
जब तक मिश्रा जी(अजय मिश्रा टेनी) के बेटे आशीष के ऊपर कार्रवाई नहीं होती, वो जांच में शामिल नहीं होता, मैं यहां भूख हड़ताल पर बैठूंगा। इसके बाद मैं मौन हूं कोई बात नहीं करूंगा: नवजोत सिंह सिद्धू, लखीमपुर हिंसा मामले में दिवंगत पत्रकार रमन कश्यप के परिवार से मुलाकात के बाद pic.twitter.com/uXyUobSnSK
— ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2021
भाजपा सोडून अन्य सर्व पक्षांचे नेते लखीमपूर गावाचे दौरे करत आहेत. पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटत आहेत. परंतु ते एकमेकांची भेट घेण्याचे टाळताना दिसत आहेत. येथे देखील पक्षीय अभिनिवेश मोठ्या प्रमाणावर पुढे येताना दिसतो आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App