largest corona outbreak in India : देशात दररोज आढळणारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही आधीचे सर्व विक्रम मोडत आहे. आज देशात पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 217,353 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 1185 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. तथापि, याच काळात कोरोनातून 1,18,302 जण बरेही झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 200,739 नवीन रुग्ण समोर आले होते. गतवर्षी 30 सप्टेंबर रोजी देशात अकराशेहून अधिक बाधितांचा मृत्यू झाला होता. largest corona outbreak in India, 2.17 lakh new patients in 24 hours, 1185 deaths
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात दररोज आढळणारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही आधीचे सर्व विक्रम मोडत आहे. आज देशात पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 217,353 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 1185 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. तथापि, याच काळात कोरोनातून 1,18,302 जण बरेही झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 200,739 नवीन रुग्ण समोर आले होते. गतवर्षी 30 सप्टेंबर रोजी देशात अकराशेहून अधिक बाधितांचा मृत्यू झाला होता.
एकूण कोरोना रुग्ण – 1 कोटी 42 लाख 91 हजार 917 एकूण बरे झालेले – 1 कोटी 25 लाख 47 हजार 866 एकूण सक्रिय रुग्ण – 15 लाख 69 हजार 743 एकूण मृत्यू – 1 लाख 74 हजार 308 एकूण लसीकरण – 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 डोस दिले
India reports 2,17,353 new #COVID19 cases, 1,18,302 discharges and 1,185 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry Total cases: 1,42,91,917Total recoveries: 1,25,47,866 Active cases: 15,69,743Death toll: 1,74,308 Total vaccination: 11,72,23,509 pic.twitter.com/dQYtH8QCN6 — ANI (@ANI) April 16, 2021
India reports 2,17,353 new #COVID19 cases, 1,18,302 discharges and 1,185 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,42,91,917Total recoveries: 1,25,47,866 Active cases: 15,69,743Death toll: 1,74,308
Total vaccination: 11,72,23,509 pic.twitter.com/dQYtH8QCN6
— ANI (@ANI) April 16, 2021
हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या संतांच्या 13 आखाड्यांपैकी एक असलेल्या निरंजन आखाड्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बिघडणारी परिस्थिती पाहून कुंभमेळ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी म्हणाले की, “मुख्य शाही स्नान 14 एप्रिल रोजी मेष संक्रांतीच्या वेळी संपन्न झाले. आमच्या आखाड्यात अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आमच्यासाठी कुंभमेळा पूर्ण झाला आहे.”
दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार कुंभमेळ्याचा कालावधी कमी करून अवघ्या एका महिन्यावर आणण्यात आला होता. सर्वसाधारणपणे दर 12 वर्षांनी घेण्यात येणारा कुंभमेळा जानेवारीच्या मध्यापासून एप्रिलपर्यंत चालतो.
काल महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 61,695 नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या, 36,39,855 वर पोहोचली आहे. या महामारीमुळे आणखी 349 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा एकूण आकडा 59,153 वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा हा एका दिवसात आढळलेला दुसरा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी 63,294 रुग्ण आढळले होते.
largest corona outbreak in India, 2.17 lakh new patients in 24 hours, 1185 deaths
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App