Karbi Anglong Agreement : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्बी आंगलोंग करारावर स्वाक्षरी झाली. करारानंतर अमित शहा म्हणाले की, आज ऐतिहासिक कार्बी आंगलोंग करार झाला आहे. मोदी सरकार दशके जुने संकट सोडवण्यासाठी व आसामची प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. Karbi Anglong Agreement Has Been Signed In Presence Of Union Home Minister Amit Shah
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्बी आंगलोंग करारावर स्वाक्षरी झाली. करारानंतर अमित शहा म्हणाले की, आज ऐतिहासिक कार्बी आंगलोंग करार झाला आहे. मोदी सरकार दशके जुने संकट सोडवण्यासाठी व आसामची प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
ते म्हणाले की, हा दिवस आसाम आणि कार्बी प्रदेशाच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आज 5 हून अधिक संघटनांचे सुमारे 1000 कार्यकर्ते शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. ते म्हणाले की, कार्बी आंगलोंगच्या संदर्भात आसाम सरकार पाच वर्षांत एका क्षेत्राच्या विकासासाठी 1000 कोटी रुपये खर्च करेल. नरेंद्र मोदी सरकारचे धोरण असे आहे की, आम्ही केलेल्या करारातील सर्व अटी आम्ही आमच्या वेळेत पूर्ण करतो.
कार्बी भाइयों को विशेष तौर पर जनजातीय लोगों को छठी अनुसूची में आने वाले क्षेत्र में आरक्षण की सुविधा मिलेगी। उनकी भाषाओं के विकास के लिए काम किया जाएगा। क्षेत्र के विकास के लिए 500 करोड़ रुपये राज्य सरकार और 500 करोड़ रुपये केंद्र सरकार काउंसिल को देगी: असम CM हिमंत बिस्वा सरमा pic.twitter.com/Ib2dRn0DoX — ANI_HindiNews (@AHindinews) September 4, 2021
कार्बी भाइयों को विशेष तौर पर जनजातीय लोगों को छठी अनुसूची में आने वाले क्षेत्र में आरक्षण की सुविधा मिलेगी। उनकी भाषाओं के विकास के लिए काम किया जाएगा। क्षेत्र के विकास के लिए 500 करोड़ रुपये राज्य सरकार और 500 करोड़ रुपये केंद्र सरकार काउंसिल को देगी: असम CM हिमंत बिस्वा सरमा pic.twitter.com/Ib2dRn0DoX
— ANI_HindiNews (@AHindinews) September 4, 2021
याप्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, बोडो आणि कार्बी, आसाममधील दोन आदिवासी गट आसामपासून वेगळे होऊ इच्छित होते. बोडो करारावर 2009 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली आणि आसामची प्रादेशिक अखंडता राखताना विकासाचे नवीन मार्ग उघडले. कार्बी करार आज झाला. यामुळे कार्बी आंगलोंग परिसरात शांतता येईल.
यादरम्यान, आसामचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, दशकांपूर्वीचे संकट सोडवण्यासाठी वचनबद्ध असलेल्या ऐतिहासिक कार्बी आंगलोंग करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल मी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानतो. आसामची अखंडता राखल्याबद्दल मी आसामच्या मुख्यमंत्र्यांचेही आभार मानू इच्छितो. आजच्या करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धाडसी गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांचाही हातभार लागला आहे.
ते म्हणाले की, माझा मुंबईत तीन दिवसांचा कार्यक्रम होता, पण मला कळले की येथे एक महत्त्वाचे काम होणार आहे. म्हणून मी करारामुळे तेथील माझी भेट रद्द केली.
कार्बी हा आसामचा एक प्रमुख जातीय समूह आहे. यात अनेक गट आहेत. कार्बी समूहाचा इतिहास 1980 च्या दशकाच्या सुरुवातीपासून खून, जातीय हिंसा, अपहरण आणि कर आकारणीशी संबंधित आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी करारानंतर सांगितले की, नवीन कराराअंतर्गत भारतीय संविधानाच्या अनुसूची 6 नुसार डोंगराळ जमातीतील लोकांना आरक्षणाचा हक्क मिळेल.
या वर्षी फेब्रुवारीमध्येही, पाच संघटनांमधील 1,040 कार्बी अतिरेक्यांनी मुख्य प्रवाहात परतण्यासाठी आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमोर शस्त्रे ठेवली. कार्बी लोंगरी (पीडीसीके), कार्बी लोंगरी एनसी हिल्स लिबरेशन फ्रंट (केएलएनएलएफ), कार्बी पीपल्स लिबरेशन टायगर (केपीएलटी), कुकी लिबरेशन फ्रंट (केएलएफ) आणि युनायटेड पीपल्स लिबरेशन आर्मी (यूपीएलए) अशी या उग्रवादी संघटनांची नावे आहेत.
Karbi Anglong Agreement Has Been Signed In Presence Of Union Home Minister Amit Shah
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App