वृत्तसंस्था
लंडन : अमेरिकन सैन्य मागे घेतल्यानंतर कट्टरपंथी तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातून गिळला. आता भारताने जम्मू- काश्मीरमधील सैन्य मागे घेतले तर ते जम्मू काश्मीर गिळण्याबरोबरच तेथील लोकशाही संपुष्टात आणतील, असा खणखणीत इशारा ब्रिटनचे खासदार बॉब ब्लैकमैन यांनी दिला. If India withdraws its troops, Islamic extremists will swallow up Jammu and Kashmir and end democracy; British MP’s warned
ब्रिटनच्या संसदेत जम्मू- काश्मीरमधील मानवाधिकार यावर झालेल्या चर्चेत खासदार बॉब ब्लैकमैन बोलत होते. खासदार डेबी अब्राहम आणि मूळचे पाकिस्तानचे रहिवासी आणि खासदार यासमीन कुरैशी यांनी काश्मीरमधील मानवाधिकार या मुद्यावर चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर ते बोलत होते. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अनेक देशात वाढणाऱ्या इस्लामिक दहशतवाद मुद्यावरून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. हीच चिंता ब्रिटनच्या संसदेत व्यक्त करण्यात आला.
अफगाणिस्तानातील घडामोडींवर भारताने बरीक लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसाठी जगभरातून आता चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा मुद्दा जागतिक पातळीवर अग्रक्रमाने मांडण्यास अनेक देशांनी सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार बॉब ब्लैकमैन यांनी संसदेत हा मुद्दा मांडला आहे. इस्लामिक तत्त्वे अफगाणिस्तानप्रमाणे जम्मू काश्मीरमधील लोकशाही संपुष्टात आणतील.
जर भारतीय सैनिक परत जातील तर इस्लामिक ताकदे जम्मू कश्मीर मध्ये लोकशाही संपुष्टात आणतील. भारतीय सैन्यचा तालिबानी दहशतवाद्यांना रोखू शकते. सैन्यामुळेच तेथे लोकशाही भक्कपणे टाकून आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App