भारत संस्कृतीच्या धाग्याने बांधलेला भू-सांस्कृतिक देश, अमित शाह यांचे प्रतिपाद


विशेष प्रतिनिधी

पुद्दुचेरी : देशाची संस्कृती ही विविध प्रांतांना एकत्रित बांधून ठेवते. त्यामुळेच भारत संस्कृतीच्या धाग्याने बांधलेला भू-सांस्कृतिक देश असून, त्यातून सर्व समस्यांचे आपोआप निराकरण होते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.Amit Shah’s statement that India is a geo-cultural country built on the thread of culture

श्री ऑरोबिंदो यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. शाह म्हणाले, देश समजून घेण्यासाठी प्रत्येकाने आॅरोबिंदो यांचे साहित्य वाचले, ऐकले पाहिजे, त्यांचे योगदान जाणून घेतले पाहिजे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून बंगालपर्यंत अशी एक संस्कृती असून ती देशाला बांधून ठेवत आहे.



देश याच धाग्याने बांधलेला राहण्याची गरज आहे. या देशात एकसूत्र कोणते असेल तर ते येथील संस्कृतीच आहे. देशाच्या कणकणात संस्कृती आहे. हीच बाब ऑरोबिंदो यांचे साहित्य वाचले की लक्षात येते.पुद्दुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा’, अशी मागणी मुख्यमंत्री एन. रंगसामी यांनी या वेळी केली.

अमित शहा यांनी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. या वेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये रंगासामी यांनी राज्याच्या दजार्ची मागणी केली. ‘पुद्दुचेरीच्या विकासासाठी अधिक निधी उपलब्ध झाल्यास ती महत्त्वाची बाब ठरेल. केंद्र सरकारच्या सहकायार्मुळेच पुद्दुचेरी विकासमार्गावर चालत आहे, असे ते म्हणाले.

Amit Shah’s statement that India is a geo-cultural country built on the thread of culture

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात