काश्मीर खोऱ्यात अवघ्या सात महिन्यांत ७८ दहशतवाद्यांचा खात्मा


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : गेल्या सात महिन्यांत काश्मीलर खोऱ्यात ७८ दहशतवादी मारण्यात यश आले आहे. त्यापैकी ३९ दहशतवादी लष्करे तय्यबाचे होते तर अन्य दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन, अल बद्र, जैश महंमद आणि अन्सार गजवातुल हिंदशी जोडलेले आहेत. 78 terrorist neutralised in JK in seven months

काल शहरातील आलमदार कॉलनीत आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. अहमद सोफी आणि बिलाल अहमद असे मृत दहशतवाद्यांची नावे असून ते लष्करे तय्यबा संघटनेसाठी काम करत होते. दोन्ही दहशतवादी स्थानिक असून ते श्रीनगरच्या नातीपोरा भागातील रहिवासी होत.

दोन्ही दहशतवादी १४ डिसेंबर २०२० पासून घातपाती कारवायांत सामील होते. हे दहशतवादी तीन घटनांत सहभागी होते आणि जून महिन्यांपासून त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात होती. काल त्यांच्याबाबत माहिती मिळाली असता श्रीनगरच्या इदगाह भागाला वेढा घातला. यावेळी त्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु त्यांनी दाद दिली नाही आणि चकमक सुरू झाली. त्यात दोघेही मारले गेले. ते दोघेही लष्करे तय्यबात सक्रिय होते.

78 terrorist neutralised in JK in seven months

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात