केंद्र सरकार कायदा करून शेतकऱ्यांना एमएसपी गॅरंटी का देत नाही? मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल सिंग यांचा खोचक सवाल

वृत्तसंस्था

इम्फाळ : केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी आज देशभर रेल रोको आंदोलन करत असताना मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल सिंग यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार कायदा करून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी का देत नाही?, असा खोचक सवाल केला आहे/ जोपर्यंत केंद्रसरकार कायद्याद्वारे एमएसपीची गॅरंटी देत नाही तोपर्यंत आंदोलक शेतकरी शांत होणार नाहीत, असा इशारा देखील सत्यपाल सिंग यांनी दिला आहे. Why the central government does not give MSP guarantee to farmers by law? Meghalaya Governor Satyapal Singh’s sharp question



राज्यपाल पदासारख्या घटनात्मक पदावर असताना सत्यपाल सिंग यांनी केंद्र सरकारला अशा पद्धतीचा सल्ला दिल्याने त्याची राजकीय वर्तुळात वेगळ्या स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे. एक प्रकारे राज्यपाल या घटनात्मक पदावर राहून सत्यपाल सिंग हे राजकीय वादग्रस्त बाबीवर मत व्यक्त करत आहेत ह हा औचित्यभंग नाही का?, अशी चर्चा आहे. केंद्र सरकारकडून याबाबत नेमकी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसरीकडे संयुक्तिक किसान मोर्चाचे शेतकरी उत्तर भारतात ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन करत आहेत. उत्तर भारतातल्या बहुतेक रेल्वे स्टेशन्सच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे गाड्या अडवून धरल्या आहेत. कोणत्या स्टेशनवर आम्ही आंदोलन करणार आहोत याच्या सूचना प्रवाशांना देण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलन प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाहीत, अशी ग्वाही संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे.

Why the central government does not give MSP guarantee to farmers by law? Meghalaya Governor Satyapal Singh’s sharp question

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात