वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरस पसरल्याची बातमी समोर आली आहे. वास्तविक, कोझिकोडे जिल्ह्यात तापामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत अलर्ट जारी केला आहे.Two die of fever in Kerala, fear of Nipah virus, health department issues alert
कोझिकोडमध्ये तापामुळे दोन अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. हे दोन्ही मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. निपाहच्या भीतीमुळे मृतांपैकी एकाच्या नातेवाइकाला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यानंतर आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली.
कोझिकोडमध्ये यापूर्वी दोनदा निपाहचा उद्रेक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. 2018 मध्ये पहिल्या उद्रेकादरम्यान, एकूण 23 प्रकरणे समोर आली होती आणि त्यात 17 मृत्यू झाले होते.
निपाह व्हायरस काय आहे, कसा पसरतो?
निपाह व्हायरस हा एक नवीन विषाणू आहे जो प्राण्यांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. मलेशियामध्ये 1999 मध्ये त्याची पहिली केस आढळून आली होती. यानंतर सिंगापूर आणि बांगलादेशमध्येही या विषाणूची प्रकरणे नोंदवण्यात आली. हा विषाणू वटवाघुळ आणि डुकरांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरतो.
त्याचबरोबर या विषाणूची लागण झालेल्या वटवाघूळ किंवा डुक्कराने कोणतेही फळ खाल्ल्यास निपाह विषाणू त्या फळाद्वारे मानवांमध्ये पसरू शकतो. निपाह विषाणूमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यही त्याला बळी पडू शकतात. अशा परिस्थितीत निपाह बाधित व्यक्तीचे अंतिम संस्कार करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. हा विषाणू इतका धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे की तो एखाद्याचा जीवही घेऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App