उत्तर प्रदेशात बकरीदनिमित्त सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात बकरीदची तयारी सुरू असून बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. जनावरांच्या बाजारातही बकऱ्यांची खरेदी जोरात सुरू आहे. बकरीदला ईद-उल-अजहा असेही म्हणतात. मुस्लिम धर्माच्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या यानिमित्त देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशू बलिदानासाठी नियम बनवण्यात आले असून केवळ नेमलेल्या ठिकाणीच कुर्बानीला परवानगी आहे. संवेदनशील भागातही पोलिसांची गस्त सुरू आहे.Section 144 imposed in Noida rules regarding Kurbani in Hyderabad Polices indication regarding Bakri Eid
उत्तर प्रदेशात बकरीदनिमित्त सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे. राजधानी लखनऊसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पोलीस सतर्क आहेत. लखनऊमध्ये, अधिकाऱ्यांनी मोठ्या पोलीस दलासह गस्त घातली आणि शहरातील संवेदनशील भागांचा आढावा घेतला. पोलिसांचे पथक क्लॉक टॉवर परिसरात गस्त घालताना दिसले. पोलिसांच्या पथकाने जुन्या लखनऊच्या संवेदनशील भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांना कोणत्याही प्रकारे वातावरण बिघडू द्यायचे नाही.
तेलंगणातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राजधानी हैदराबादमधील लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, प्राण्यांचा बळी दिल्यानंतर त्यांनी टाकलेले भाग महापालिकेच्या डस्टबिनमध्येच टाकावे लागतील. ईदपूर्वीच्या तयारीबाबत दक्षिण विभागाच्या डीसीपी स्नेहा मेहरा म्हणाल्या, “आपल्याला विनंती आहे की, विभाग आणि सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ईदचा हा सण एकत्र साजरा करा. आम्हाला आशा आहे की एकदा प्राण्यांचा बळी दिल्यानंतर त्यांचा कचरा GHMC डब्यात टाकला जाईल, जेणेकरून आम्ही आपले शहर स्वच्छ ठेवू.”
डीसीपी स्नेहा मेहरा पुढे म्हणाल्या, “एकदा प्राण्यांचे शव किंवा कोणतेही साहित्य इकडे-तिकडे फेकले गेल्यास रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. नमाज शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मशिदींमध्ये योग्य व्यवस्था केली जाईल, याची आम्ही खात्री केली आहे. हा सण शांततेत पार पडावा यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App