अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सचा ६ गडी राखून पराभव केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्सने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (IML) २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सचा ६ गडी राखून पराभव करून इंडिया मास्टर्सने ट्रॉफी जिंकली. या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताने १७ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य सहज गाठले. भारताच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो अंबाती रायुडू होता, ज्याने ५० चेंडूत ७४ धावांची सामना जिंकणारी खेळी केली.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांचा सलामीवीर ड्वेन स्मिथने ४५ धावा केल्या. तर लेंडल सिमन्सने ५७ धावांचे योगदान दिले. तर ब्रायन लारा आणि विल्यम्स पर्किन्स प्रत्येकी ६ धावा करून बाद झाले. भारताकडून शाहबाज नदीम आणि विनय कुमार यांनी शानदार गोलंदाजी केली. शाहबाज नदीमने ४ षटकांत फक्त १२ धावा देत २ बळी घेतले. तर विनय कुमारने ३ विकेट्स घेतल्या.
इंडिया मास्टर्सकडून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अंबाती रायुडू आणि सचिन तेंडुलकर सलामीला आले. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची सलामी भागीदारी केली, पण त्यानंतर सचिन २५ धावा करून बाद झाला. त्यानंतर गुरकीरत सिंग मान १४ धावा करून बाद झाला, पण रायुडू एका टोकाला उभा राहिला आणि त्याने ५० चेंडूत ७४ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये, स्टुअर्ट बिन्नीच्या ९ चेंडूत १६ धावांच्या योगदानामुळे, इंडिया मास्टर्सने ६ विकेट्सने सामना जिंकला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App