केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची मोठी घोषणा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारतातील मूलभूत शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात १०० नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचे हे पाऊल देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल.
केरळमधील अलाप्पुझा येथील विद्याधीरराज सैनिक शाळेच्या ४७ व्या वार्षिक दिन समारंभात बोलताना राजनाथ म्हणाले की, केंद्र सरकारने सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाचा मार्गही मोकळा केला आहे. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी सैनिक शाळांचा विस्तार देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य, दळणवळण, उद्योग, वाहतूक आणि संरक्षण यासारख्या विविध क्षेत्रात प्रगती करून देश स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, शिक्षण आणि मुलांच्या सर्वांगीण विकासात क्रांतीची आवश्यकता आहे यावर त्यांनी भर दिला. सैनिकाकडे फक्त युद्धाच्या दृष्टिकोनातून पाहू नये, कारण प्रत्येक सैनिकात इतर अनेक गुण असतात. असं ते म्हणाले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App