रेल्वेमंत्री म्हणाले- बालासोर दुर्घटना सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे, रेल्वे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी सांगितले की, ओडिशातील बालासोर येथे सिग्नलमध्ये गडबड झाल्याने रेल्वे अपघात झाला.Railway Minister said – Balasore accident due to failure of signal system, negligence of railway authorities

रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अपघाताचा तपास पूर्ण केला आहे. अपघाताच्या काही दिवसांपूर्वी नॉर्थ सिग्नल (गुमती स्टेशन) येथील सिग्नलिंग सर्किटमध्ये बदल झाल्याचे तपासात समोर आले आहे.



स्थानकावरील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 94 साठी इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरिअर बदलण्याच्या कामात सिग्नलिंगच्या कामादरम्यान हा गोंधळ झाला. यामुळे मालगाडी आधीच उभी असताना चुकीच्या मार्गावर रेल्वेला ग्रीन सिग्नल देण्यात आला.

याच कारणामुळे कोरोमंडल एक्सप्रेस रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. त्यानंतर बंगळुरू-हावडा सुपरफास्टची कोरोमंडलच्या डब्यांशी धडक झाली. या अपघातातून रेल्वे अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा दिसून येतो.

मार्क्सवादी नेते जॉन ब्रिटास आणि राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत ही माहिती लेखी स्वरूपात दिली. त्यांनी सभागृहात उल्लेख केलेला 40 पानांचा अहवाल 3 जुलै रोजी समोर आला.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले – 41 मृतांची ओळख पटली नाही

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या अपघातात 295 जणांचा मृत्यू झाला. 176 जण गंभीर जखमी, 451 जणांना किरकोळ दुखापत झाली असून 180 जणांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. अपघातात प्राण गमावलेल्या 41 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे. बालासोर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना ७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. आरोपींविरुद्ध कलम 304, 201 आणि रेल्वे कायद्याच्या कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष न्यायालयाने तिघांनाही पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. 11 जुलै रोजी तिघांच्याही कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली होती. तिघांची सीबीआय कोठडी शुक्रवारी संपली, त्यानंतर त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 जुलै रोजी होणार आहे.

दुसरीकडे, 12 जुलै रोजी रेल्वेने 7 अधिकाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये अटक करण्यात आलेल्या 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दक्षिण पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार मिश्रा म्हणाले की, हे अधिकारी सतर्क असते तर ही दुर्घटना घडली नसती.

Railway Minister said – Balasore accident due to failure of signal system, negligence of railway authorities

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात