विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) पिकांच्या खरेदीची हमी आणि इतर अनेक मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. . सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी आता पूर्ण ताकदीनिशी आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Rail stop movement across the country on March 10 in farmers movement
शेतकरी संघटनांनी सांगितले की, 6 मार्च रोजी हजारो शेतकरी शंभू सीमेवरून राजधानी दिल्लीकडे मोर्चा काढणार आहेत. मात्र, त्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततेत असेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आले असून जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत.
शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की, आमचा दिल्लीकडे कूच करण्याचा कार्यक्रम तसाच आहे, आम्ही त्यापासून मागे हटलो नाही. सीमेवर आपली ताकद वाढवू, असा निर्धार केला आहे. 6 मार्च रोजी देशभरातून शेतकरी ट्रेन, बसने येतील आणि सरकार त्यांना तिथे बसू देते की नाही ते पाहू. 10 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून देशभरात ‘रेल रोको’ आंदोलन करणार आहोत…”
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या, पण कोणताही परिणाम झाला नाही. सरकारकडून शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आणि चर्चेतून समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन सातत्याने केले जात असले तरी, एमएसपीबाबत सरकार अजूनही आडमुठेपणा दाखवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे आंदोलनाशिवाय त्यांच्याकडे इतर काहीही पर्याय उपलब्ध नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App