Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या काळात ५,३५,००० कोटी रुपयांची बँकांची फसवणूक झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. Rahul Gandhi attack on Modi government, said- 5 lakh 35 thousand crore bank fraud so far in Modi’s time, what a good day
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या काळात ५,३५,००० कोटी रुपयांची बँकांची फसवणूक झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
75 वर्षांत भारतातील जनतेच्या पैशांची एवढी हेराफेरी कधीच झाली नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदींच्या मित्रांसाठी चांगले दिवस आहेत. याच्या एक दिवस आधीही राहुल यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीसाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले होते.
मोदी काल में अब तक ₹5,35,000 करोड़ के बैंक फ़्रॉड हो चुके हैं- 75 सालों में भारत की जनता के पैसे से ऐसी धांधली कभी नहीं हुई। लूट और धोखे के ये दिन सिर्फ़ मोदी मित्रों के लिए अच्छे दिन हैं।#KiskeAccheDin — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 13, 2022
मोदी काल में अब तक ₹5,35,000 करोड़ के बैंक फ़्रॉड हो चुके हैं- 75 सालों में भारत की जनता के पैसे से ऐसी धांधली कभी नहीं हुई।
लूट और धोखे के ये दिन सिर्फ़ मोदी मित्रों के लिए अच्छे दिन हैं।#KiskeAccheDin
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 13, 2022
बेरोजगारीमुळे आत्महत्या वाढल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. बेरोजगारी कशामुळे वाढली? या बेरोजगारी आणीबाणीला केंद्र सरकार जबाबदार आहे.
ट्विटशिवाय राहुल गांधी यांनी एक लेखही शेअर केला आहे. ज्यामध्ये 2018 ते 2020 दरम्यान बेरोजगारी आणि कर्जामुळे 25,000 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं.
बुधवारीच केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एनसीआरबीच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, देशात बेरोजगारीमुळे अनेकांनी आपला जीव दिला आहे. ते राज्यसभेत म्हणाले की, मागच्या काही वर्षांत दिवाळखोरपणा आणि कर्जात बुडाल्याने जीव देणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Rahul Gandhi attack on Modi government, said- 5 lakh 35 thousand crore bank fraud so far in Modi’s time, what a good day
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App