म्हणाले ‘योगीजींनी सत्य सांगितले, जोपर्यंत सनातन जिवंत आहे..’
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील पुराणी मंडी चौकात राष्ट्रीय वीर दुर्गादास राठोड यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी जनतेला संबोधित करताना बांगलादेशचे उदाहरण देत म्हटले होते की, बांगलादेशात काय परिस्थिती आहे? आपण सर्वांनी पाहिले आहे की अशा परिस्थितीत आपल्याला एकजूट राहण्याची गरज आहे. जनतेला आवाहन करताना योगी पुढे म्हणाले होते की, ”बंटोगे तो कटोगे,एक रहोगे तो नेक रहोगे”
आचार्य प्रमोद कृष्णम ( Pramod Krishnam ) यांनी मुख्यमंत्री योगींच्या विधानाचे समर्थन करताना म्हटले आहे की, जोपर्यंत सनातन जिवंत आहे तोपर्यंत भारत तोडता येणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, हिंदू एकता आवश्यक आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले की, सत्तेच्या लालसेपोटी विरोधकांना भारताचे तुकडे करायचे आहेत. राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियांका गांधी यांनी बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार पाहिलेले नाहीत?, त्यांच्या मनात फक्त पॅलेस्टाईनची वेदना आहे. याशिवाय जेएनयूचे नाव बदलून भारत विद्यापीठ करण्यात यावे, असेही ते म्हणाले.
आग्रा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी यांनी बांगलादेशचे उदाहरण देत म्हणाले, बांगलादेशात काय परिस्थिती आहे? आपण सर्वांनी पाहिले आहे की अशा परिस्थितीत आपल्याला एकजूट राहण्याची गरज आहे. जनतेला आवाहन करताना योगी पुढे म्हणाले की, ‘तुम्ही फूटाल तर तुम्ही कटाल, तुम्ही एकसंध राहाल तर उदात्त राहाल.’ तसेच योगी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे वचन दिले आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करावे लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App