विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारताने मिशन गंगा अभियान सुरू केले आहे. त्याला पाकिस्तानने पाठिंबा दिला असून हवाई मार्ग खुला करून दिला आहे.एअर इंडियाच्या विमानाने विद्यार्थी भारतात येत आहेत.Pakistan’s support to India’s mission Ganga, given the air route open
वैमानिकाने सांगितले की, युक्रेनमधील गंभीर परिस्थिती पाहता सर्वजण एकमेकांना मदत करत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया आणि हंगेरीमार्गे भारतात आणले जात आहे. बुखारेस्ट, रोमानिया येथून एअर इंडियाचे विमान दिल्लीला पोहोचले. हे विमान विशेष चार्टर फ्लाइट म्हणून चालवण्यात आले.
या विमानाचे पायलट कॅप्टन अचिंत भारद्वाज यांनी सांगितले की, पाकिस्तानसह सर्व एअर ट्रॅफिक कंट्रोलने (एटीसी) निर्वासन मोहिमेला पाठिंबा दिला आहे.कॅप्टन भारद्वाज म्हणाले, मनोरंजक गोष्ट म्हणजे आम्हाला रोमानियन ते दिल्ली, तेहरान ते पाकिस्तानपर्यंत सर्व एटीसी नेटवर्कने पाठिंबा दिला.
पाकिस्ताननेही आम्हाला कोणतेही कारण न विचारता थेट हवाई मार्ग दिला. त्यामुळे वेळेचीही बचत झाली. आम्ही रोमानिया मार्गे उड्डाण करत नाही परंतु एटीसी आणि सरकारमध्ये चांगला समन्वय होता.आॅपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून आतापर्यंत एकूण 709 विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे.
बुडापेस्ट, हंगेरी येथून 240 भारतीय नागरिकांनीही उड्डाण केले आहे. याआधी शनिवारी रोमानियाहून पहिले विमान 219 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईला पोहोचले. पाच पायलट, 14 केबिन क्रू, तीन विमान अभियंते आणि दोन सुरक्षा कर्मचारी रोमानियाच्या विशेष विमानासाठी तैनात करण्यात आले होते.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App