वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानने 1999च्या लाहोर कराराचे उल्लंघन केल्याचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मान्य केले आहे. या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वाक्षरी केली होती. जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या कारगिलमधील घुसखोरीचा अप्रत्यक्ष उल्लेख करून ते म्हणाले, ही आमची चूक होती.’Pakistan broke agreement with India…’, Nawaz Sharif admits his mistake after 25 years
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत कबूल केले की, “28 मे 1998 रोजी पाकिस्तानने 5 अणुचाचण्या केल्या होत्या. त्यानंतर वाजपेयी साहेबांनी येथे येऊन आमच्याशी करार केला, पण आम्ही त्या कराराचे उल्लंघन केले. ती आमची चूक होती.”
काय होता लाहोर करार?
लाहोर करार हा दोन युद्ध करणाऱ्या शेजाऱ्यांमधील शांतता करार आहे. ज्यात इतर गोष्टींवर लक्ष देण्यासह शांतता आणि सुरक्षा राखणे आणि दोन्ही देशांमधील लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र, नवाझ शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने काही वेळातच कारगिलमध्ये घुसखोरी करून त्याचे उल्लंघन केले. पाकिस्तानी लष्कराच्या या घुसखोरीमुळे कारगिल युद्ध झाले.
या दिवशी पाकिस्तानने केली अणुचाचणी
पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी मार्च 1999 मध्ये आपल्या लष्कराला जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात घुसखोरी करण्याचे आदेश दिले होते. भारताला ही घुसखोरी कळताच मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू झाले. नवाझ शरीफ पंतप्रधान असताना भारताने युद्ध जिंकले होते. वास्तविक, आज पाकिस्तानने आपल्या पहिल्या अणुचाचणीचा 26वा वर्धापन दिन साजरा केला.
जेव्हा अमेरिकेने 5 अब्ज डॉलर्स देऊ केले!
“अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला अणुचाचण्या करण्यापासून रोखण्यासाठी पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिली होती, परंतु मी नकार दिला,” असे ते त्यांच्या पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पीएमएलएनच्या बैठकीत म्हणाले. इम्रान खानवर निशाणा साधत ते म्हणाले, “जर (माजी पंतप्रधान) इम्रानसारखे लोक माझ्या जागेवर असते तर त्यांनी क्लिंटनची ऑफर स्वीकारली असती.”
जेव्हा नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले
पनामा पेपर्स प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. नंतर त्यांना ब्रिटनला शिफ्ट व्हावे लागले. सहा वर्षांनंतर मंगळवारी त्यांची पीएमएल-एनच्या अध्यक्षपदी ‘बिनविरोध’ निवड झाली. नवाज यांनी त्यांच्यावरील सर्व खटले खोटे असल्याचे म्हटले, ज्यामुळे त्यांना 2017 मध्ये पंतप्रधानपद सोडावे लागले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App