लोकसभा निवडणूक अजून 4 वर्षे लांब आहे. काही राज्यांच्या निवडणुका 2025 – 26 मध्ये आहेत, पण त्यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकेलच याची कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा दूरच्या राजकीय क्षितिजावर पण दिसत नव्हती.Sonia Gandhi Rahul gandhi suresh kalmadi modi photo
पण तरी देखील तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला 2025 मध्येच तोंड फुटले आणि ते देखील काँग्रेसच्या कर्मावर आणि भाजपच्या वर्मावर बोट ठेवत!! त्यामुळे या चर्चेला महत्त्व आलेय आणि तिच्यात तथ्यही आहे.
त्याचे झाले असे :
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी बरेच विषय चर्चेसाठी आणले. पण त्यातला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा काँग्रेसच्या कर्मावर आणि भाजपच्या वर्मावर बोट ठेवणारा निघाला.
भाजपच्या सरकारने आत्तापर्यंत विरोधी पक्षांच्या सरकारांना खूप छळले. भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या आरोपांखाली विरोधी पक्षांच्या मोठ्या नेत्यांना तुरुंगात घातले. अनेकांवरचे आरोप सिद्ध झाले नाहीत म्हणून अनेक नेते तुरुंगाच्या बाहेर आले, पण या सगळ्याचे वैशिष्ट्य असे की भाजपच्या सरकारने फक्त प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनाच तुरुंगात घातले. काँग्रेसचा एकही नेता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेला नाही. काँग्रेसच्या विरोधातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खटले हळूहळू मागे पडले किंवा ते काढून घेतले गेले. त्या उलट प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांवरचे रेटून चालविण्यात आले. हा महत्त्वाचा मुद्दा आतिशी यांनी मुलाखतीतून समोर आणला.
– फक्त काँग्रेसचे नेते तुरुंगाबाहेर
त्यासाठी अतिशी यांनी काही उदाहरणे समोर मांडली. सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची केस खूप वर्षे चालली. ते खटल्यांच्या सुनावणीला हजर राहिले. पण अजूनही सरकारने त्यांना तुरुंगात घातलेले नाही. नॅशनल हेरॉल्ड केस मध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोन्ही महत्त्वाचे आरोपी अजूनही जामिनावरच बाहेर आहेत. पण या केस मध्ये इतर कुठलाही नेता अजून तुरुंगात गेलेला नाही. काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांच्या विरोधातली कॉमनवेल्थ घोटाळ्याची केस 15 वर्षांनंतर केंद्रीय तपास यंत्रणांनीच गुंडाळून टाकली. या सगळ्या केसेस कडे आतिशी यांनी आवर्जून लक्ष वेधले.
– प्रादेशिक पक्षांच्या विरोधात काँग्रेस
त्या उलट अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, अभिषेक बॅनर्जी, द्रविड मुन्नेत्र कळघमचे मंत्री, उबाठा शिवसेनेचे नेते या सगळ्यांना तुरुंगात जावे लागले. मात्र, त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी INDI आघाडीतली आपली नेतृत्वाची जबाबदारी नीट सांभाळली नाही. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसाठी काँग्रेसने आपली ताकद उभी केली नाही. त्या उलट काँग्रेसच्या नेत्यांनी केरळमध्ये कम्युनिस्ट नेत्यांविरुद, आंध्र आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांविरुद्ध आपली ताकद वापरली. दिल्ली आणि पंजाब मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाशी वैर पत्करले. याची “किंमत” काँग्रेसने भाजपकडून वसूल केली. भाजपने देखील काँग्रेसला “विशिष्ट राजकीय किंमत” देऊन टाकली, असा आरोप आतिशी यांनी केला.
त्याचवेळी आतिशी यांनी भाजप आणि काँग्रेस वरून अन्य प्रादेशिक पक्षांच्या तिसऱ्या आघाडीची गंभीर वकिली केली. काँग्रेस आणि भाजप यांच्यात अलिखित करार आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांनी वेळीच सावध होऊन राष्ट्रीय पातळीवरच्या तिसऱ्या आघाडीचा विचार करावा. त्यात काही फॉर्म्युला ठरविण्याच्या दृष्टीने आत्तापासून पावले टाकावीत, अशी सूचना त्यांनी केली. ही सूचना करतानाच आतिशी यांनी नेमकेपणाने काँग्रेसच्या कर्मावर आणि भाजपच्या वर्मावर बोट ठेवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App