वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या मुहूर्तावर सांगितले की, आम्हाला देशात फाळणी नको आहे. त्या म्हणाल्या की, ईदच्या दिवशी वचन देते की मी जीव देईन पण देशाची फाळणी होऊ देणार नाही. सीएम ममता बॅनर्जी कोलकाता येथील रेड रोडवर ईदच्या नमाजनंतर एका सभेला संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी जनतेला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संघटित होऊन भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले.Mamata Banerjee’s address to the public after Eid Namaz, unite against BJP for 2024 elections!
ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘आम्हाला बंगालमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला दंगली नकोत, देशात फाळणी नको, शांतता हवी. काही लोक देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि द्वेषाचे राजकारण करत आहेत. मी जीव द्यायला तयार आहे, पण देशाची फाळणी होऊ देणार नाही.
भाजपला म्हटले दंगलखोर पक्ष
भाजपला दंगलखोर पक्ष म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की शांत राहा, कोणाचेही ऐकू नका. मला ‘दंगल पार्टी’शी लढावे लागेल, एजन्सीशीही लढावे लागेल. मी माझ्या हिंमतीच्या जोरावर त्यांच्याशी लढत आहे. मी त्यांच्यापुढे झुकणार नाही.
मुस्लिम मतांवर काय म्हणाल्या
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “कोणीतरी भाजपकडून पैसे घेतो आणि म्हणतो की आम्ही मुस्लिम मतांचे विभाजन करू. मी त्यांना सांगते की, त्यांच्यात भाजपसाठी मुस्लिम मतांचे विभाजन करण्याची हिंमत नाही. हे माझे आज तुम्हाला वचन आहे. निवडणुकीला वर्ष आहे. बघूया कोण जिंकतो आणि कोण नाही!!
त्या पुढे म्हणाल्या की, लोकशाही गेली तर सर्व काही निघून जाईल. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे. त्यांनी एनआरसी आणले. मी त्यांना हे करू देणार नाही, असेही ममता म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App