विशेष प्रतिनिधी
मुंबई :2020 मध्ये कोव्हिड 19 ने धुमाकूळ घातला तेेव्हा आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण आणि आव्हानात्मक आहे. त्यामुळे ब्रेक द चेन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत .
सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले आहे.
MAHARASHTRA LOCKDOWN 2021
काय म्हणाले मुख्यमंत्री
आज ते सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App