नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारताने संपर्क साधला
विशेष प्रतिनिधी
दुबई : इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इस्रायलशी जोडलेले एक मालवाहू जहाज ताब्यात घेतले. यामुळे ते हा महत्त्वाचा शिपिंग मार्ग बंद करू शकतात, असे इराणने म्हटले आहे. इराणने सीरियन वाणिज्य दूतावासावर इस्त्रायली हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशाराही दिला आहे.Iranian army seizes Israeli ship 17 Indians were on board
त्याचवेळी इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणी लष्कराने जप्त केलेल्या इस्रायली कंटेनर जहाजात सतरा भारतीयही आहेत. भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारत सरकारने इराणशी संपर्क साधला आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, भारतीय नागरिकांची सुरक्षित आणि लवकर सुटका सुनिश्चित करण्यासाठी भारत तेहरान आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राजनैतिक माध्यमांद्वारे इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.
किंबहुना, इराणची ही कारवाई १२ दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात तेहरान इस्रायलवर मोठा हल्ला करू शकते, अशी भीती वाढत चालली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App