Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाने दाखवले अदम्य धाडस; बेपत्ता बोटीतून ५४ प्रवाशांची सुटका

Indian Coast Guard

कवरत्तीहून सुहेलीपार बेटाला जात असताना ही बोट बेपत्ता झाली होती.


विशेष प्रतिनिधी

लक्षद्वीप : Indian Coast Guard एक मोठी बातमी समोर आली आहे. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील मोहम्मद कासिम-II नावाच्या बेपत्ता बोटीतून भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) जहाजाने २२ महिला आणि २३ मुलांसह ५४ प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवले आहे. कवरत्तीहून सुहेलीपार बेटाला जात असताना ही बोट बेपत्ता झाली होती.Indian Coast Guard

भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, लक्षद्वीप प्रशासनाने मंगळवारी दुपारी २.३० वाजता तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला कावरत्तीहून सुहेलीपार बेटाकडे जाणारी बोट असल्याची माहिती दिली. ५४ प्रवासी आणि ३ क्रू मेंबर्ससह एक बोट बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली.



ही बोट १४ जानेवारी रोजी पहाटे १२:१५ वाजता कावरट्टीहून सुहेलीपार बेटासाठी निघाली होती आणि सकाळी ९ वाजेपर्यंत सुहेलीपारला पोहोचणे अपेक्षित होते. या बोटीवर २२ महिला, ९ पुरुष, ३ नवजात आणि २० मुले होती.

या प्रकरणात, तटरक्षक दलाने ताबडतोब शोध आणि बचाव कार्य (SAR) सुरू केले. रिमोट ऑपरेटिंग स्टेशन (ROS) द्वारे शोध घेत असताना, बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळले आणि ती समुद्रात अडकली. तसेच, तटरक्षक दलाने त्वरित कारवाई करत बोट शोधून काढली आणि सर्व ५४ प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवले. ही घटना भारतीय तटरक्षक दलाच्या जलद आणि प्रभावी बचाव कार्याचे उदाहरण बनली.

Indian Coast Guard shows indomitable courage rescues 54 passengers from missing boat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात