नाशिक : गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाने आता पाण्यावरून अणुबॉम्ब युद्ध भडकवणारी भाषा केली. पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या अमेरिका भेटीत हे घडले.
भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर देखील पाकिस्तानने स्वतःच्या विजय झाल्याचा डंका पिटला. असीम मुनीरला फिल्ड मार्शली बहाल केली. पण दरम्यान भारताने 33 देशांमध्ये सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे पाठवून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू भक्कम केली. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारताची ही आयडिया अर्धवट चोरली. त्यांनी एक दोनच शिष्टमंडळे परदेशात पाठवली. यापैकी एक शिष्टमंडळाचे नेतृत्व पाकिस्तानचा माजी परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचा नेता बिलावल भुट्टो याने केले.
पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने अमेरिकेत अनेकांच्या भेटी घेतल्या. पाकिस्तानची लंगडी का होई ना, पण बाजू मांडली. याच भेटीत वॉशिंग्टन मध्ये मिडल ईस्ट इन्स्टिट्यूट मध्ये बिलावल भुट्टोने भाषण केले. या भाषणात त्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाण्याच्या मुद्द्यावर अणुयुद्ध होऊ शकते, असा दावा केला. पहलगाम हल्ल्याचे निमित्त करून भारताने सिंधू जल करार स्थगित केला. पाकिस्तानचे पाणी तोडले. पाकिस्तानी जनतेला तहानलेले ठेवले. पण पाकिस्तान हा अन्याय सहन करणार नाही. भारताने सिंधू जल करार स्थगित करून दोन्ही देशांमध्ये आण्विक युद्ध भडकवण्यासाठी तयारी केली आहे. पाकिस्तान भारताला त्याच पद्धतीने उत्तर देईल, अशी धमकी बिलावल भुट्टोने दिली. त्याचवेळी त्याने क्लायमेट चेंज वर भाषण ठोकले.
– जुल्फिकार अली भुट्टोची पोकळ धमकी
पण भारताला पाण्यावरून अणुबॉम्ब युद्धाची धमकी देणाऱ्या बिलावल भुट्टोची ही खानदानी फितरतच आहे. बिलावल भुट्टोचा आजोबा पाकिस्तानचा माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टोने 1970 च्या दशकात भारताला अशीच पोकळ धमकी दिली होती. इंदिरा गांधींच्या सरकारने 1974 मध्ये पोखरण मध्ये पहिला अणुस्फोट केला. त्यावेळी पाकिस्तानची चिडचिड झाली. तेव्हा जुल्फिगार अली भुट्टो म्हणाला होता की पाकिस्तानचे लोक एक वेळेस गवत खाऊन राहतील, पण पाकिस्तान अणुबॉम्ब बनवल्याशिवाय राहणार नाही. त्यानुसार पाकिस्तानच्या लोकांना भुट्टो सरकारने आणि त्यानंतरच्या सगळ्या सरकारांनी भिकारी ठेवले, पण ते स्वतःच्या तंत्रज्ञानानुसार अणुबॉम्ब बनवू शकले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानला इराण आणि उत्तर कोरिया कडून अणुबॉम्बचे तंत्रज्ञान चोरावे लागले. या चोरलेल्या अणुबॉम्बचा वापर पाकिस्तानला कधी करता आला नाही. 1999 च्या कारगिल युद्धात देखील पाकिस्तानने अणुबॉम्ब वापरायची पोकळ धमकी दिली पण प्रत्यक्षात ते तो वापरू शकले नाहीत.
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अणुबॉम्ब साठ्याला धक्का लागला. त्याबरोबर पाकिस्तान गुडघ्यावर आला. अमेरिकेकडे धावला. भारताने शस्त्रसंधी करावी, यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना फोन केले त्याचवेळी पाकिस्तानचा अणुबॉम्ब फुसका असल्याचे स्पष्ट झाले. तरी देखील गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाने अमेरिकेत जाऊन भारताला पाण्यावरून अणुबॉम्ब युद्धाची धमकी दिली. भुट्टो खानदानाची पोकळ फितरत सिद्ध केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App