विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारवर तेलंगण उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले तसेच आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून येणाऱ्या रुग्णवाहिका सीमांवरच रोखल्या जात असल्याने रोष व्यक्त केला आहे. High court lashes on Telangana govt.
दरम्यान तेलंगणमध्ये कोरोनाच्या रुग्णामध्ये अचानक वाढ झाल्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी आज दहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन २२ मेपर्यंत कायम असेल. या काळात केवळ जीवनावश्यलक सेवा सुरू राहतील.
जीवनावश्यक औषधे, उपकरणांची साठेबाजी आणि काळाबाजार तातडीने रोखा, उच्च न्यायालयाचे केंद्र, राज्यांना आदेश
कोरोनाच्या काळामध्ये अशा पद्धतीने अमानवीयरितीने वागणे शोभते का? असा सवालही यावेळी न्यायालयाकडून करण्यात आला. राज्यातील कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. आजच्या सुनावणीला हैदराबाद, सायबराबाद आणि राचकोंडा येथील पोलिस आयुक्त आणि विभागीय आयुक्त देखील उपस्थित होते.
राज्य सरकारने कोणत्या अधिकाराच्या आधारे या रुग्णवाहिका रोखून धरल्या आहेत, असा थेट सवाल देखील न्यायालयाने केला. राज्यामध्ये रात्रीच्या संचारबंदीचे योग्य पद्धतीने पालन करण्यात आले नाही. राज्य सरकार न्यायालयामध्ये जे दावे करते तसे प्रत्यक्षात काहीच घडताना दिसत नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App