प्रतिनिधी
नवी दिल्ली : “ऐन निवडणुकीत कोरोनाने केला घात; बडे नेते आले लोकांच्या दारात!!”, अशी स्थिती आता उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब मध्ये दिसू लागली आहे.Coronation in Ain election; Big leaders came to people’s door
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचे मोठे मेळावे, राजकीय नेत्यांच्या मोठ्या रॅल्या, पदयात्रा, मोटरसायकल किंवा सायकल यात्रा यांच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना प्रचारात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे बडे नेते आता रस्त्यारस्त्यांवर फिर ताना आणि लोकांच्या दारात जाताना दिसू लागले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिवसभर गोव्यात जनतेच्या दारोदारी जाऊन प्रचार पत्रके वाटली आणि आम आदमी पार्टीचा प्रचार केला. तर दुसरीकडे काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उत्तर प्रदेशातील नोएडाच्या रस्त्यावर उतरून घरोघरी चालत जाऊन काँग्रेसचा प्रचार केला.
AAP national convenor Arvind Kejriwal held a door-to-door campaign in a poll-bound Goa "We just did a door-to-door campaign, people are very excited to vote for Aam Aadmi Party, as they require a change & are tired of the other two parties," he says pic.twitter.com/rkljo9woQX — ANI (@ANI) January 16, 2022
AAP national convenor Arvind Kejriwal held a door-to-door campaign in a poll-bound Goa
"We just did a door-to-door campaign, people are very excited to vote for Aam Aadmi Party, as they require a change & are tired of the other two parties," he says pic.twitter.com/rkljo9woQX
— ANI (@ANI) January 16, 2022
अरविंद केजरीवाल आणि भूपेश बघेल हे दोन मुख्यमंत्री आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले पहिले बडे नेते आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता अनेक नेते रस्त्यावर उतरून जनतेच्या दारोदार जाऊन आपापल्या पक्षांसाठी मते मागताना दिसणार आहेत.
Congress leader & Chhattisgarh CM Bhupesh Bagehl participated in a door-to-door campaign in Noida, ahead of UP Assembly elections. pic.twitter.com/OsjWcJidBm — ANI (@ANI) January 16, 2022
Congress leader & Chhattisgarh CM Bhupesh Bagehl participated in a door-to-door campaign in Noida, ahead of UP Assembly elections. pic.twitter.com/OsjWcJidBm
राजकीय पक्षांचे मोठे मेळावे, मोठ्या नेत्यांच्या बड्या रॅल्या, मोटर सायकल यात्रा, पदयात्रा यांना निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत बंदी घातली होती. परंतु ती तारीख उलटून गेल्यानंतरही ही बंदी ठेवण्यात आलेली आहे. देशातली कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे ही बंदी उठण्याची शक्यता कमी आहे,
असे गृहीत धरून बडे नेते मुकाटपणे रस्त्यावर उतरून जनतेच्या दारोदार पायी जाताना दिसत आहेत. यानिमित्ताने जनतेला मुख्यमंत्र्यांसारखे बडे नेते आपल्या दारात पाहून समाधानही वाटत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App