काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मणिशंकर अय्यर यांनी मुघल आणि मुस्लीम यांच्याबाबत वेगळा राजकीय राग आळवला आहे. ते म्हणाले की, मुघलांनी धर्माच्या नावाखाली कधीही अत्याचार केले नाहीत. याशिवाय त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आणि जिनांचं कौतुकही केलं. मणिशंकर अय्यर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, आम्ही (काँग्रेस) अकबरला आपलाच मानतो. परंतु भारत हा मुस्लिम देश झाला नाही, उलट बाजूने बघितले तर सर्व मुस्लिमांचा देश आहे.Congress Leader Mani Shankar Ayyar Controvarsial statement Over Mughals Attacked BJP
प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मणिशंकर अय्यर यांनी मुघल आणि मुस्लीम यांच्याबाबत वेगळा राजकीय राग आळवला आहे. ते म्हणाले की, मुघलांनी धर्माच्या नावाखाली कधीही अत्याचार केले नाहीत. याशिवाय त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आणि जिनांचं कौतुकही केलं. मणिशंकर अय्यर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, आम्ही (काँग्रेस) अकबरला आपलाच मानतो. परंतु भारत हा मुस्लिम देश झाला नाही, उलट बाजूने बघितले तर सर्व मुस्लिमांचा देश आहे.
मणिशंकर अय्यर यांनी जुन्या जनगणनेचा दाखला देत सांगितले की, 1872 मध्ये देशातील 72 टक्के हिंदू आणि 24 टक्के मुस्लिम होते. कमी-अधिक प्रमाणात ही संख्या अजूनही तेवढीच आहे, त्यामुळे मुस्लिमांवर लोकसंख्या वाढल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मणिशंकर अय्यर यांनी यावेळी मुघल राजवटीचे कौतुक केले आहे. नेहरू जयंतीनिमित्त एका कार्यक्रमादरम्यान मणिशंकर अय्यर यांनी मुघल राजवटीत झालेल्या अत्याचाराच्या चर्चेचे खंडन केले. मुघल सम्राट अकबरापासून ते इतर सर्व मुघल सम्राटांपर्यंत, त्यांनी दावा केला की मुघल राजवटीत कधीही जबरदस्तीने धर्म परिवर्तन झाले नाही.
‘मुघलांनी हा देश आपला मानला’
मुघली राजवटीचे कौतुक करत अय्यर म्हणाले की, ब्रिटीश आणि मुघल यांच्यातील मोठा फरक म्हणजे मुघल या देशाला आपला मानत होते. अय्यर यांनी बाबरचे कौतुक केले आणि सांगितले की, बाबरने आपला मुलगा हुमायूनला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्याने भारतातील लोकांच्या धर्मात हस्तक्षेप न करण्याबद्दल सांगितले होते. यामुळेच अकबराच्या काळात धर्माच्या नावावर भेदभाव नव्हता.
ते म्हणाले, “मुघलांनी हा देश स्वतःचा बनवला. इंग्रज म्हणाले की, आम्ही येथे राज्य करण्यासाठी आलो आहोत. ज्या बाबरच्या नावे भाजपचे लोक मला बाबरची औलाद म्हणतात, मला सांगायचे आहे की तोच बाबर 1526 मध्ये भारतात आला आणि तो 1530 मध्ये मरण पावला. म्हणजे तो राहिला भारतात फक्त 4 वर्षे. त्याने हुमायूनला सांगितले की जर तुम्हाला हा देश चालवायचा असेल, जर तुम्हाला तुमचे साम्राज्य सुरक्षित ठेवायचे असेल, तर तुम्ही इथल्या रहिवाशांच्या धर्मात ढवळाढवळ करू नका.
भाजपच्या मते केवळ 80 टक्के भारतीय, इतर परकीय : अय्यर
यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. सत्तेत असलेल्यांनाच देशातील 80 टक्के जनतेची चिंता आहे, असा आरोप काँग्रेस नेत्याने केला. अय्यर म्हणाले, जे सत्तेत आहेत त्यांच्यासाठी फक्त 80% लोक खरे भारतीय आहेत, बाकीचे पाहुणे म्हणून जगत आहेत. मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत त्यांनी केलेल्या विधानाच्या समर्थनार्थ युक्तिवाद मांडताना त्यांनी वस्तुस्थितीही मांडली. मणिशंकर अय्यर यांनी जुन्या जनगणनेचा दाखला देत सांगितले की, १८७२ मध्ये ब्रिटिशांनी पहिली जनगणना केली आणि ६६६ वर्षे राज्य केल्यानंतर भारतात मुस्लिमांची संख्या २४ टक्के आणि हिंदू ७२ टक्के असल्याचे दिसून आले.
‘जिनांची स्तुती’
भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, “ते म्हणतात की भांडण झाले, सगळ्या मुलींवर बलात्कार झाला आणि सगळ्यांना मुस्लिम केले. अहो, तुम्ही मुस्लिम झाला असता तर आकडे वेगळे असायला हवे होते. 72 टक्के मुस्लिम असायला हवे होते आणि 24 टक्के हिंदू असायला हवे होते.” पण वास्तव काय होते की फक्त इतकेच होते
आणि त्यामुळेच फाळणीची मागणी करण्यापूर्वी जिनांची एकच मागणी होती की सेंट्रल असेंब्लीमध्ये 30 टक्के आरक्षण द्यावे, त्यांनी आम्हाला 80 द्या किंवा 90 टक्के द्या असे सांगितले नाही. त्यांनी 30 टक्के मागितले आणि ते नाकारले गेले, कारण त्या दिवशी त्यांची संख्या फक्त 26 टक्के होती.”
दरम्यान, मणिशंकर यांच्या या वक्तव्यावरून आता नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. मुस्लिम आक्रमकांमुळेच भारतातील अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळे उद्ध्वस्त झाल्याचा स्पष्ट इतिहास आहे. याशिवाय बाबर ते औरंगजेबापर्यंत अनेक मुस्लिम शासकांचाही या तोडफोडीत हातभार आहे, हे जगजाहीर आहे,
असे असतानाही इतिहासाची मोडतोड करून अय्यरांना काय सिद्ध करायचे आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, लवकरच पाच राज्यांत निवडणुका होऊ लागल्या आहेत. यामुळे गमावलेला मुस्लिम जनाधार पुन्हा मिळवण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचाही आरोप होऊ लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App