पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा भारतात मात्र आत्मा वंचनाची लागलीये स्पर्धा!! अशी ऑपरेशन सिंदूर नंतर आजची अवस्था आहे.
पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर तुर्कस्तान, अझरबैजान, ताजिकिस्तान देशांमध्ये हिंडून पाकिस्तानी विजयाच्या टिऱ्या बडवत आहेत, तर दुसरीकडे भारतात मात्र सत्यशोधनाच्या नावाखाली आत्मवंचनेची स्पर्धा लागली आहे. त्यामध्ये चीफ डिफेन्स स्टाफ सह काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. वास्तविक चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS जनरल अनिल चौहान यांना blumberg ला मुलाखत देताना भारतीय विमाने पाकिस्तानने पाडली, वगैरे कबुली देण्याची काहीच गरज नव्हती. त्यांनी केलेले वक्तव्य सडेतोड मानले, तरी त्या वक्तव्याची पद्धत मुत्सद्देगिरीचे लक्षण दाखवणारी नव्हती. Military strategy अशी उथळपणे बोलून सध्याच्या information warfare मध्ये स्वतःहून पीछेहाट करून घेण्याची काही कारण नव्हते, पण जनरल अनिल चौहान यांच्याकडून ते घडले.
वास्तविक shangrila dialogue मध्ये जनरल अनिल चौहान यांनी भारताचे नवे धोरण चांगले विशद केले. भारताने दहशतवादाविरुद्ध लढा देताना new normal कसे set केले, हे सर्व स्पष्ट करून सांगितले, पण भारताची विमाने पाकिस्तानने पाडली का?? या सवालाला सकारात्मक उत्तर देण्याचे कारण नसताना ते केवळ अर्ध्या वाक्यामध्ये सकारात्मक उत्तर देऊन बसले आणि भारताचा narrative खाली आणला गेला. काँग्रेस सारख्या पक्षाच्या हातात आयते कोलीत मिळाले. ज्या काँग्रेसने संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे कायम दुर्लक्ष केले, संरक्षण सामग्री उत्पादन करण्यापेक्षा तिच्या आयातीकडे आणि दलालीकडे जास्त लक्ष पुरविले, देशाच्या उत्तर सीमा soft borders ठेवल्या, त्या काँग्रेसच्या नेत्यांना CDS च्या अर्ध्या वक्तव्याचे निमित्त मिळाल्याने मोदी सरकारला घेरता आले आणि त्यातून अनावश्यक आणि वाट्टेल ते सवाल मोदी सरकारवर डागता आले.
मोदी सरकार मुत्सद्देगिरीत कमी पडले. आज पाकिस्तानला सगळे मित्र मिळालेत, पण भारताच्या बाजूने कोणीच उभे राहायला तयार नाही, अशी मुक्ताफळे उधळण्याची संधी शमा मोहम्मदला मिळाली. जयराम रमेश आणि पवन खेडा यांना नेहमीप्रमाणे मोदी सरकारवर दुगाण्या झोडण्याची संधी प्राप्त झाली.
– काँग्रेसवाले अर्ध्या हळकुंडाने पिवळे
वास्तविक प्रत्यक्ष युद्ध सुरू असताना किंवा युद्धजन्य परिस्थिती असताना सत्य शोधण्याच्या नावाखाली अशी आत्मवंचना कधी करायची नसते. आपल्याच सैन्य दलाचे मनोधैर्य खचवायचे नसते. संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करून National strategy उघड करून सांगायची नसते. हे काँग्रेसच्या नेत्यांना समजत नाही असे नाही, उलट सर्वाधिक काळ सत्तेवर राहिल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना ते मोदी सरकार मधल्या सर्व घटकांपेक्षा अधिक चांगले समजते. पण केवळ मोदींच्या आक्रमक धोरणाला खोडा घालण्यासाठी, चीन आणि पाकिस्तानचा narrative छुप्या पद्धतीने पुढे रेटण्यासाठी काँग्रेसचे राहुलनिष्ठ नेते मोदी सरकारला विशेषतः वैयक्तिकरित्या मोदींना घेरले आणि त्यासाठी त्यांना CDS चे अर्धे वक्तव्य देखील पुरले.
– असा घेणार का POK??
पण हेच काँग्रेस नेते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, राहुल गांधी एकदा पंतप्रधान होऊ द्यात. पाकिस्तान व्याप्त काश्मीर ते भारतात सामील करून घेतील. पण भारतीय सैन्य दलांचे मनोधैर्य खच्ची करून किंवा उत्तरेतल्या सर्व सीमा soft borders ठेवून पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेणे शक्य आहे का??, हा सवाल कुणी विचारताना दिसत नाही अगदी भाजपचे प्रवक्ते सुद्धा तो सवाल काँग्रेसवर डागत नाहीत.
– Master stroke चा प्रचार फोन करणार??
वास्तविक सिंधू जल करार स्थगित करून मोदी सरकारने खरं तर master stroke हाणला, पण त्याबद्दल भाजपचे प्रवक्ते कुठला आक्रमक प्रचार आणि प्रसार करताना दिसत नाहीत. उलट मेहबूबा मुफ्तींसारख्या नेत्या पाकिस्तानचा छुपा अजेंडा चालवून मानवतेच्या नावाखाली हा करार पुन्हा स्थापित करायचे भाषा करत आहेत, पण त्याला भाजपचे नेते उत्तर देताना दिसत नाहीत.
नेमका हाच आत्मवंचनेचा प्रकार सध्या भारतात सुरू आहे. वास्तविक भारताने चार दिवसांमध्ये पाकिस्तानचे 20 % हवाईदल नष्ट केले. 100 किलोमीटर खोलवर घुसून दहशतवादी अड्डे नष्ट केले. 33 देशांमध्ये 52 खासदार पाठवले. त्या देशांमध्ये भारताची बाजू बळकटपणे मांडली. याबद्दल CDS आणि अन्य घटकांनी बोलण्याऐवजी CDS भारताची विमाने पाडल्याबद्दल बोलले, हे काही चांगल्या narrative setting चे काम झाले नाही. narrative setting मध्ये मोदी सरकार खूप कमी पडत असल्याचे हे लक्षण उघडपणे दिसले. इथे खऱ्या अर्थाने correction ची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App