दुहेरी चारधाम मार्गाला सर्वोच्च न्यायालयाची अखेर मंजुरी, महत्वाच्या प्रकल्प मार्गी लागणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज दुहेरी चारधाम महामार्ग प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या रुंदीकरणाला हिरवा कंदील दर्शविला. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून भूतकाळामध्ये आपल्याला यामुळेच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते, असे न्यायालयाने नमूद केले.CharDham corridor will cleared by Court

लष्करासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचे महत्त्व नाकारता येत नाही तसेच त्याबाबत न्यायालय देखील अंदाज बांधू शकत नाही असे न्या. डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगतानाच यावर देखरेख ठेवण्यासाठी माजी न्या. ए.के.सिकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक सदस्यीय समिती स्थापन केली.



ही समिती या प्रकल्पाच्या पाहणीचा अहवाल थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करू शकेल. चारधाम महामार्ग प्रकल्प हा ९०० किलोमीटरचा असून त्याच्यावर बारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे सर्व ऋतूंमध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथपर्यंत जाता येईल.

CharDham corridor will cleared by Court

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात