मुख्यमंत्री पेमा खांडू सांगितलं विजया मागचं गुपीत
विशेष प्रतिनिधी
इटानगर: अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकतर्फी विजय मिळवला आहे. राज्यातील विधानसभेच्या एकूण 60 जागांपैकी भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत. नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) 5 जागा जिंकल्या आहेत. BJPs victory under CM Pema Khandu is a reflection of the lessons Modi
काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. इतर उमेदवार 8 जागांवर विजयी झाले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, हा विजय एक मोठा जनादेश आहे, जो अरुणाचलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामांना जनतेचा पाठिंबा दर्शवतो.
अभिनेता संजय दत्त बनला अरुणाचल प्रदेशचा ब्रँड अॅम्बेसेडर, व्यसनमुक्तीवर करणार जनजागृती, ट्वीट करून मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
तुमचा विजय 2019 पेक्षा खूप मोठा आहे, हे कसे घडले? एनडीटीव्हीच्या या प्रश्नावर पेमा खांडू म्हणाले, “यावेळी चांगला विजय आहे, जनतेने भारतीय जनता पक्षाला विक्रमी जनादेश दिला आहे.” 2019 च्या निवडणुकीत आम्ही 60 पैकी 41 जागा जिंकल्या. आता यावेळी भाजपच्या 5 जागा वाढल्या असून आम्हाला 46 जागा मिळाल्या आहेत. तसेच ते म्हणाले, “हे एक चांगले लक्षण आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात जे काम झाले आहे, विशेषत: अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या 10 वर्षात जे काम झाले आहे, हे परिणाम पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाचे प्रतिबिंब आहेत.
भ्रष्टाचारामुळे जनतेने काँग्रेसला नाकारले
तुम्ही आधी काँग्रेसमध्ये होता, नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. दीर्घकाळ मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशात काँग्रेस पूर्वी खूप मजबूत होती. आता फक्त एका सीटपुरते मर्यादित राहण्याचे कारण काय? या प्रश्नावर पेमा खांडू म्हणाले, “काँग्रेस पक्षाने अरुणाचल प्रदेश आणि संपूर्ण ईशान्येत दीर्घकाळ सरकार चालवले.” त्या काळात अरुणाचल प्रदेशात काँग्रेसने संपूर्ण भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली होती. त्या वेळी केंद्र सरकारकडून कोणतेही काम करावयाचे असल्यास ते सरकार पैशाशिवाय मंजूर करत नव्हते. जनता, अधिकारी, नेते… सर्वांना भ्रष्ट व्यवस्थेत जगावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App