जाणून घ्या, नेमका कुणाला आणि काय दिला आहे इशारा?
विषय प्रतिनिधी
हैदराबाद – Akbaruddin Owaisis आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे, एआयएमआयएम नेते आणि तेलंगणा विधानसभेचे सदस्य अकबरउद्दीन ओवैसी यांनी रविवारी (१ जून २०२५) वक्फ सुधारणा कायदा, २०२५ बाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की वक्फशी संबंधित त्यांचे हक्क ते कधीही सोडणार नाहीत आणि त्यांचा पक्ष वक्फसाठी कायमच लढत राहील.Akbaruddin Owaisis
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून (एआयएमपीएलबी) वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शने केली गेली. तेव्हा यामध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) आमदार आणि तेलंगणा विधानसभेतील पक्षाचे नेते अकबरउद्दीन ओवैसी यांनी वक्फ (सुधारणा) कायद्याबद्दल उपस्थित लोकांना संबोधित केले.
अकबरूद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, “ज्यांना वाटते की ते या कायद्याद्वारे आमचे मनोबल कमकुवत करू शकतात, त्यांना मी असे म्हणू इच्छितो की आमचे मनोबल ढळलेले नाही आणि ढळणारही नाही. आम्ही आमचे शरियत, हिजाब, वक्फ सोडण्यास तयार नाही. आम्ही लोकशाही आणि कायद्याच्या कक्षेत राहून आमच्या हक्कांसाठी लढत राहू.
याशिवाय, एआयएमआयएमने आरोप केला की वक्फबाबतचा हा नवीन कायदा, वक्फची मालमत्ता वाचवण्यासाठी किंवा जतन करण्यासाठी आणला गेलेला नाही, तर नष्ट करण्यासाठी बनवण्यात आला आहे. ”
याचबरोबर खासदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, वक्फच्या मालमत्तेचा नाश करणारा हा वक्फ दुरुस्ती कायदा मागे घेतला जावा. त्याचवेळी, असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ दुरुस्ती कायदा, २०२५ च्या घटनात्मकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि त्याच्या घटनात्मक वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App