वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना, ओमीक्रोनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लसीकरण मोहीम अधिक वाढविण्यावर भर दिला जाणार असून लस न घेणाऱ्यांवर निर्बंधांचा विचार सरकार करत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. Vaccination campaigns will be expedited in rural areas; Government considers strict restrictions on non-vaccinators
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दोन लसीचे डोस घेतलेल्यांना संसर्गाची तीव्रता सौम्य आहे. सध्या रुग्णालयात दाखल होत असलेले बहुतांश लोकांनी लस घेतलेली नाही तसेच प्राणवायूची गरज भासणारे सर्व कोरोनाबाधित हे लस न घेतलेलेच आहेत. लसीबाबत उदासीन असलेल्या लोकांबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होण्यापूर्वीच भीती लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा तसेच लस न घेणाऱ्यांवर कडक निर्बंध व त्यांना सरकारी योजनांपासून वंचित करण्याचा कठोर निर्णय घेण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App