
प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशासह भाजपने चार राज्ये जिंकल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिरतेचा धोका उत्पन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे सरकार केव्हाही पडू शकते, असे वक्तव्य राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केले होते. आज त्यांच्याच वक्तव्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.Thackeray – Pawar Govt: If BJP breaks Mahavikas alliance, government will fall; Prithviraj Chavan spoke after Kumar Ketkar
विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा जोर वाढला आहे. पण तरी देखील निवडणुकीचा निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर होईल, असे वाटत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण त्याच वेळी त्यांनी भाजपने महाविकास आघाडीतला एखादा घटक फोडला तर हे सरकार पडू शकते, असे वक्तव्य केले.
- घराणेशाही नाही म्हणजे नाहीच, भाजपने तिकिट नाकारल्याने रिटा बहुगुणा- जोशी यांचा मुलगा समाजवादी पक्षात
त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे आणि ते केव्हाही पडू शकते, या राजकीय शंकेला मोठा वाव मिळाला आहे. कुमार केतकर यांच्यासारखे काँग्रेस हायकमांडच्या जवळचे खासदार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखेही काँग्रेस हायकमांडच्या जवळचेच वरिष्ठ नेते महाविकास आघाडी सरकारच्या पडण्याच्या गोष्टी करतात तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिरतेच्या शंकेचे रूपांतर खात्रीत व्हायला लागते.
Thackeray – Pawar Govt: If BJP breaks Mahavikas alliance, government will fall; Prithviraj Chavan spoke after Kumar Ketkar
महत्त्वाच्या बातम्या
- CONTROVERSIAL KCR : हिंदुस्तानातील एका राज्याच्या मुख्यमंत्री पदाला अशोभनीय वक्तव्य ! ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
- Maharashtra Budget 2022 : मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव; केसीआर – उद्धव ठाकरे भेटीचा परिणाम…??
- The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ – शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट- प्रत्येकानं बघावा असा सिनेमा- लपवलेला हिंदूंचा इतिहास-अनुपम खेर म्हणतात हा अभिनय नव्हे जिवंत इतिहास…
- Maharashtra Budget 2022 : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातले काम अर्धवट; पण बजेटमध्ये मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव!!