प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेचा ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने आले असताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या निवडणुकीत वेगळा ट्विस्ट आणला. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची निवड बिनविरोध करावी, असे आवाहन त्यांनी केले. अशाच आशयाचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील केले आहे.Sharad Pawar’s appeal after Raj Thackeray
या निवडणुकी संदर्भात शरद पवारांनी वेगळा तर्क मांडला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. परिवारातलीच व्यक्ती पोटनिवडणुकीसाठी उभे राहत असेल तर शक्यतो निवडणूक बिनविरोध करावी, असे आम्हाला वाटते.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक साधारणतः दीड वर्षांच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे श्री. पटेल यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. pic.twitter.com/cgw0C5kDDY — Sharad Pawar (@PawarSpeaks) October 16, 2022
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक साधारणतः दीड वर्षांच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे श्री. पटेल यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. pic.twitter.com/cgw0C5kDDY
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 16, 2022
शिवाय ही निवडणूक फक्त दीड वर्षासाठीच आहे. कारण दीड वर्षानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणारच आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा बोजा उमेदवारावर टाकू नये, असे आपल्याला वाटत असल्याचे शरद पवार म्हणाले.
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याची आपल्याला कोणतीही कल्पना नाही. आपण फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने पक्षाची भूमिका मांडतो आहोत. असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीचे उदाहरण दिले. मुंडे यांच्या परिवारातील कोणी उभे राहणार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही, असे त्यावेळी त्यांनी जाहीर केले होते. त्यावेळी तर लोकसभा सदस्यत्वाचा पावणे पाच वर्षांचा कालावधी होता. पण तरी देखील राष्ट्रवादीने मुंडे परिवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, असा निर्णय घेतला होता, याची आठवण पवारांनी करून दिली.
त्याचवेळी भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करायचा का नाही हा सर्वस्वी त्या पक्षाचा अधिकार असल्याचाही खुलासा शरद पवारांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App