आरोग्यमंत्री टोपेंनी केले स्पष्ट, महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही, कोर्टात प्रतिज्ञापत्रही दाखल, राऊतांची झाली पंचाईत!

not a single death occurred due to lack of oxygen in maharashtra health minister rajesh tope

health minister rajesh tope : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या अभावामुळे एकही रुग्ण मृत्यू पावला नाही. तसे प्रतिज्ञापत्र आम्ही कोर्टात दिले आहे. महाराष्ट्राला आवश्यक तेवढा ऑक्सिजन आम्ही दिला आहे. आम्ही ऑक्सिजन उद्योगातून काढून घेऊन द्रव वैद्यकीय ऑक्सिजनसाठी दिला आहे. ते म्हणाले की राज्यात ऑक्सिजनचा अपव्यय होत नाही. आम्ही ऑक्सिजनचा योग्य वापर केला आहे. आरोग्यमंत्री म्हणाले की, दुसर्‍या लाटेच्या वेळी महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले होते, त्यावेळी 65 हजार रुग्ण महाराष्ट्रात आढळत होते, त्यावेळीसुद्धा योग्य व्यवस्था केली गेली होती. देवाच्या कृपेने राज्यात ऑक्सिजन अभावी एकही रुग्ण मरण पावला नाही. not a single death occurred due to lack of oxygen in maharashtra health minister rajesh tope


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या अभावामुळे एकही रुग्ण मृत्यू पावला नाही. तसे प्रतिज्ञापत्र आम्ही कोर्टात दिले आहे. महाराष्ट्राला आवश्यक तेवढा ऑक्सिजन आम्ही दिला आहे. आम्ही ऑक्सिजन उद्योगातून काढून घेऊन द्रव वैद्यकीय ऑक्सिजनसाठी दिला आहे. ते म्हणाले की राज्यात ऑक्सिजनचा अपव्यय होत नाही. आम्ही ऑक्सिजनचा योग्य वापर केला आहे. आरोग्यमंत्री म्हणाले की, दुसर्‍या लाटेच्या वेळी महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले होते, त्यावेळी 65 हजार रुग्ण महाराष्ट्रात आढळत होते, त्यावेळीसुद्धा योग्य व्यवस्था केली गेली होती. देवाच्या कृपेने राज्यात ऑक्सिजन अभावी एकही रुग्ण मरण पावला नाही.

त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या वतीने संसदेमध्ये असे सांगण्यात आले आहे की, देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही रुग्ण मरण पावला नाही. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये नियमितपणे कोरोना केसेस आणि मृत्यूबद्दल केंद्र सरकारला माहिती देतात. परंतु ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत राज्यांनी केंद्र सरकारला कोणताही विशिष्ट डेटा दिला नाही. त्याचवेळी आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी संसदेला सांगितले की, पंतप्रधान कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद करण्यासाठी राज्यांना सतत विचारत आहेत, हे लपविण्याचे काही कारण नाही. ही राज्यांची जबाबदारी आहे. आम्ही राज्यांनी प्रदान केलेला डेटा संकलित करतो. केंद्र सरकारला हेच करत असते.

दरम्यान, एका दिवसापूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्राने जेव्हा ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नाकारले होते तेव्हा केंद्र सरकार खोटै बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपांनंतर आज महाराष्ट्र सरकारने हायकोर्टात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. याबाबत राज्य सरकारने निवेदनही जारी केले आहे. तत्पूर्वी, संजय राऊत यांनी केंद्रावर आगपाखड केली होती. मी नि:शब्द झालोय, केंद्राच्या या वक्तव्यानंतर त्या अभागी कुटुंबांनी आता कुठे जायचे? असा सवाल त्यांनी केला होता. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेच केंद्राची री ओढल्याने राऊतांची पंचाईत झाली आहे.

दरम्यान, राज्यांकडून ऑक्सिजनअभावी मृत्यूची आकडेवारी न मिळाल्याने विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. तर दुसरी लाट शिखरावर असताना रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूच्या अनेक घटनांनी जगाचे लक्ष भारताकडे वेधले होते. आम आदमी पार्टी, कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरकारला या विषयावर घेरले आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांनी बुधवारी म्हटले की, ऑक्सिजनच्या अभावामुळे देशात अनेकांचे मृत्यू झाले. अशीच एक घटना दिल्लीमध्येही पाहायला मिळाली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला नाही, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर तसे झाले नसते तर रुग्णालयांनी उच्च न्यायालयात का धाव घेतली असती? केंद्र सरकार असेही म्हणू शकते की, देशात कोणताही साथीचा रोग आला नाही, असेही ते म्हणाले.

not a single death occurred due to lack of oxygen in maharashtra health minister rajesh tope

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात