लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी परदेशातून महाराष्ट्रात प्रवेशासाठी आरटीपीसीआर बंधनकारक


विशेष प्रतिनिधी

मुंबई: लशीचे दोन्ही डोस घेतले असले तरी परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या नव्या नियमावलीनुसार राज्याने हा बदल केलेला आहे.In spite of both doses of vaccine are taken, RTPCR is mandatory for entry into Maharashtra from abroad

युरोपीय, आखाती भागातील देश आणि दक्षिण आफ्रिकेसह परदेशातून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्यासाठी कोरोनाची बाधा झाली नसल्याचा आरटीपीसीआर अहवाल दाखवणे बंधनकारक असल्याचे राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.



प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या असल्या तरी चाचणी अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. तसेच याआधीचे चाचण्यासंबंधीचे सर्व नियम या नव्या आदेशानुसार रद्द करण्यात आले आहेत.

In spite of both doses of vaccine are taken, RTPCR is mandatory for entry into Maharashtra from abroad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात