वृत्तसंस्था
मुंबई – १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख हे अजूनही पळवाटा काढण्याच्याच शोधात आहेत. सक्तवसूली संचलनालयाच्या ED चौकशीपासून आणि अटकेपासून बचावासाठी अनिल देशमुखांनी आपल्या वकीलामार्फत ED मध्ये व्यक्तीशः हजर राहण्यापासून सूट मिळण्याची याचिका सादर केली आहे.
सुप्रिम कोर्टाची ऑर्डर अजून आमच्या हातात पडायची आहे. अनिल देशमुख चौकशीसाठी सहकार्य करीत आहेत. तरीही ED मध्ये व्यक्तीशः हजर राहण्यापासून सूट मिळण्याची याचिका सादर केली आहे, अशी माहिती अनिल देशमुखांचे वकील इंदरपाल सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. An exemption application has been filed by Anil Deshmukh’s lawyer Inderpal Singh before Enforcement Directorate (ED).
तत्पूर्वी, अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला आव्हान देणारी महाराष्ट्र राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. SC dismisses Maha govt plea challenging CBI probe against ex-HM Anil Deshmukh
१०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. दुसरीकडे अनिल देशमुख यांना सक्तवसूली संचलनालयाने ED ने आज सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. या समन्सनुसार ते हजर राहिले नाहीत, तर देशमुखांना ED अटक करू शकते. कारण सुप्रिम कोर्टाने देशमुखांचे अटकेपासून बचावाचे सर्व अर्ज फेटाळले आहेत.
An exemption application has been filed by Anil Deshmukh's lawyer Inderpal Singh before Enforcement Directorate (ED). — ANI (@ANI) August 18, 2021
An exemption application has been filed by Anil Deshmukh's lawyer Inderpal Singh before Enforcement Directorate (ED).
— ANI (@ANI) August 18, 2021
अनिल देशमुख यांनी ईडीच्या अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने देशमुख यांची याचिका सोमवारी फेटाळून लावली होती. त्यामुळे देशमुख यांची अटकेपासूनची वाचण्याची सर्व शक्यता संपल्या आहेत. अशा वेळी ईडीने मंगळवारी, १७ ऑगस्ट रोजी देशमुख यांना पाचवे समन्स जारी करून आज, सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहतात का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेव्हा देशमुख यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटींची खंडणी गोळा करून ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचो, अशी साक्ष एपीआय सचिन वाझे याने मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दिली होती. यात मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाही समावेश होता.
अनिल देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून सुप्रिम कोर्टाचा जो काही निकाल येईल, त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात जबाब देण्यासाठी हजर होईन, असे म्हटले होते. परंतु, आता सुप्रिम कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर देशमुख यांनी वकीलामार्फत व्यक्तीशः हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी ईडीपुढे याचिका दाखल केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App