गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या प्रमाणापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात जास्त नुकसान भरपाई दिल्याचा दावा दादा भुसे यांनी केला.A war of words between Agriculture Minister Dada Bhuse and Devendra Fadnavis over crop insurance
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली.यावेळी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला.यानंतर कृषीमंत्री दादा भुसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार खडाजंगी झाली.
दादा भुसे म्हणाले की , गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या प्रमाणापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात जास्त नुकसान भरपाई दिल्याचा दावा दादा भुसे यांनी केला.यावर फडणवीस यांनी आक्षेप घेतला आणि म्हणाले की मंत्र्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. पण केंद्र सरकारने पीक विम्याच्या पहिल्या हप्त्याचे पैसे अजून दिले नसल्याने राज्य सरकारने दुसरा हफ्ता दिला नाही असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App