आपले सैनिक सीमेवर शहीद होत आहेत आणि तुम्ही भारत-पाक T20 खेळवणार ? असदुद्दीन ओवैसींनी मोदींवर साधला निशाणा

काश्मीरमध्ये पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी खेळत आहे,’असंही ओवैसी म्हणाले.Your soldiers are being martyred on the border and you will play India-Pakistan T20? Asaduddin Owaisi’s attack on Modi


विशेष प्रतिनिधी

हैद्राबाद : AIMIM चे नेते आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलत होते.काश्मीरमध्ये पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी खेळत आहे,’असंही ओवैसी म्हणाले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी येणाऱ्या टी-20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.



यावेळी ओवैसी म्हणाले की , एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे 9 सैनिक शहीद झाले तर दुसरीकडे मोदी सरकार 24 ऑक्टोबर रोजी क्रिकेट सामना खेळत आहे.

यादरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना म्हणाले होते की , सैनिक मरत आहे आणि मनमोहन सिंग सरकार बिर्याणी खाऊ घालत आहे. आणि आता हेच नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमध्ये आपले 9 सैनिक शहीद होतात आणि तुम्ही टी-20 खेळवणार? असंही ओवैसी म्हणाले.

Your soldiers are being martyred on the border and you will play India-Pakistan T20? Asaduddin Owaisi’s attack on Modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात