येथे ‘छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणीपुरवठा योजने’संदर्भात आढावा बैठक संपन्न
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhatrapati Sambhajinagar मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणीपुरवठा योजने’संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले.Chhatrapati Sambhajinagar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस 100 टक्के कार्यान्वित करावी. अपूर्ण कामाचे टक्केवारी-आधारित उत्तर स्वीकारार्ह नाही; नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी योजना पूर्णत्वास नेणे हेच एकमेव लक्ष्य आहे. कंत्राटदारांना काम करताना येणाऱ्या अडचणी महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून सोडवाव्यात आणि कंत्राटदारांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेलचे काम वेळेत संपवून पाणी उपसा सुरू करणे, 26 एमएलडीचा टप्पा जूनअखेर पूर्ण करणे, पाईपलाईनमधील रिकामे अंतर भरण्यासाठी 15 जूननंतर शटडाऊन घेऊन ऑगस्टअखेर काम संपवणे, आरओडब्ल्यूचे प्रश्न आठवड्यात सोडवणे आणि किमान 35 ईएसआर आणि जीएसआर टाक्या तसेच हायड्रोलिक टॅप सुरू ठेवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर देण्यात आली आहे.
तसेच, प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्व-अभियांत्रिकी पद्धतीला मान्यता द्यावी, तर महापालिकेला 822 कोटींच्या कर्ज उभारणीसाठी त्वरित मंजुरी देऊन त्यावरील वाढीव व्याज शासनाकडून भरपाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले, ज्यामुळे कामात कोणताही खंड पडू नये आणि ऑक्टोबरमध्ये शहराला अखंड, विश्वसनीय जलपुरवठा मिळावा.
बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App