विशेष प्रतिनिधी
सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेत ‘भाकणूक’ प्रथेला मोठं महत्व आहे. येत्या वर्षात हवामान आणि वातावरणाची दिशा कशी असणार याचं भविष्य यातून मांडलं जाते. यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे भाकणुकीमध्ये सांगितले. भीतीचे वातावरण कायम राहिलं तसेच राजकीय क्षेत्रात स्थिरता दिसून येईल अशी ‘भाकणूक’ केली आहे.Red, white goods will be more expensive, rain will be satisfactory Political stability but with fear ; ‘Bhakanuk’ from Siddheshwar Yatra in Solapur
ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होमप्रदीपन विधी नंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला भाकणूकस्थळी आणले जाते. याठिकाणी त्या वासराची विधिवत पूजा करण्याते येते,
मैदानावर अंथरलेल्या घोंगडीवर खारीक, विविध प्रकारचे धान्य, गूळ, खोबरे, बोर, गाजर, पाने, ऊस आदी खाद्यवस्तू ठेवण्यात येतात.यंदा या वासराने ऊस, गजाराला स्पर्श केल्याने लाल आणि पांढऱ्या वस्तू महागणार,अशी भाकणूक करण्यात आली.
दरम्यान, या वासरासमोर पेटता टेंभा धरण्यात आला तेंव्हा वासरू बिथरले. यावरून येत्या काळात घाबराटीचे वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले. तर शेवटी वासराने मूत्र विसर्जन केल्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे भाकणुकीत नमूद करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App