राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लावलेल्या मत चोरीच्या आरोपानंतर देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली. राहुल गांधींपाठोपाठ आता बरेच बडे नेतेही या विषयावर अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. याच विषयावर शरद पवार यांनी देखील एक धक्कादायक विधान केलं होतं. राज्यातील २०२४ विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत असतांना दोन लोकं आपल्याला भेटायला आलेली. त्यांनी आपल्याला १६० जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
बीडच्या कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी बीडच्या जिल्हा कारागृहात एक गांजा भरलेला चेंडू फेकला आणि त्या गांजा वाटपावरून चार कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. हा राडा एवढा शिगेला पोहोचला, की गांजाच्या मोहापाई तिथल्या कैद्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली.
आर्थिकदृष्ट्या सक्षम देशांकडून सध्या गुंडगिरी सुरू आहे.” असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाव न घेता अमेरिकेला टोला लगावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. तसेच, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. दोघांनी भेटून विधानसभेत १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती असे दावा त्यांनी केला. आता नाव आठवत नाही असे ते म्हणाले. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला असून किती खोटं बोलावं यालाही एक मर्यादा असते असे ते म्हणाले.
जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, भेट देणारे शरद पवार आज ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा काढत आहेत. शरद पवार हे इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसले आहेत, असा हल्लाबोल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
शरद पवारांनी 160 जागांसंदर्भात केलेला दावा हा वराती पाठीमागून घोडे असल्यासारखे आहे. आम्ही यापूर्वी सगळ्या पक्षांना कोर्टात जाण्याचे आवाहन केले होते, पण तेव्हा कोणीही सोबत आले नाही. आता फक्त बोंबलत बसले आहेत. किती खोटे बोलावे, यालाही एक सीमा असते,” अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘मंडल यात्रे’वर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑनलाईनच्या माध्यमातून नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यासोबतच महाराष्ट्राला देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे या वंदे भारत एक्सप्रेसची पाहणी केली. एक्सप्रेसच्या उद्धाटनाला नागरिक देखील मोठ्या संख्येने पोहोचले होते. या गाडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते पुणे हा 16 तासांचा प्रवास आता केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे.
बेरजेचे राजकारण करताना वजाबाकी नाही झाली म्हणजे मिळवली!! किंबहुना ओबीसींना जवळ करताना हाती असलेल्या मराठ्यांना गमावले नाही म्हणजे मिळवले!!, असे म्हणायचे वेळ शरद पवार यांच्या मंडल यात्रेने आणली.
दोन लोक भेटल्याच्या मुद्द्यावर किती खोटं बोलावं यालाही मर्यादा असते, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना टोला हाणला. निवडणूक प्रक्रिया 2004 पासून मॅन्युप्युलेट होते आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी नागपुरात म्हटले – जग भारताला त्याच्या अध्यात्मासाठी (आध्यात्मिक ज्ञानासाठी) महत्त्व देते. म्हणूनच ते आपल्याला विश्वगुरू मानतात. आपली अर्थव्यवस्था किती वेगाने वाढत आहे याची जगाला चिंता नाही.
श्रीमंत मराठ्यांना ओबीसी समाजाने विरोध करू नये, यासाठी शरद पवारांनी मंडल यात्रा काढली, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या जातीय राजकारणाची पोलखोल केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनानिमित्त महिलांना मोठे आश्वासन दिले आहे. “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहणार आहे. सध्या मिळणाऱ्या मानधनात आणखी वाढ केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. मुलुंड येथे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!, हेच आजपासून सुरू झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेचे वर्णन करावे लागेल.
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतांनाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (ता.९), मुंबई येथील एका पत्रकार परिषदेत बोलतांना या शक्यतांना दुजोरा दिला.
महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी (ता.६) मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा तेथील सुरक्षा रक्षकांसाठी डोकेदुखी होऊन बसलाय. सुरक्षेत हयगय केल्याप्रकरणी त्यावेळी कामावर असणाऱ्या कंत्राटी आणि कायम सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
शरद पवार आणि राहुल गांधींना 160 जागांची गॅरंटी दिली कुणी??; दोन माणसे भेटल्याची पवारांनी सोडली नवी पुडी??, असा सवाल शरद पवारांच्या आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेमुळे समोर आला.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद बोलवून तीन राज्यात मतदान चोरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगावर लावला. यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलंय. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु झालाय. अशातच, राहुल गांधींपाठोपाठ आता रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
खराडी या उच्चभ्रू वसाहतीत चालू असलेल्या एका स्टुडीओ अपार्टमेंटमधील रेव्ह पार्टी वर २६ जुलैच्या मध्यरात्री पोलीसांनी धाड टाकली. त्या ठिकाणी पोलिसांना दारू, हुक्कापॉट आणि कोकेन सापडलं. तेव्हाच, ड्रग्ज घेतल्याप्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह चार पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आतंकवादासाठी भगवा शब्द वापरू नये, त्याऐवजी सनातनी आतंकवाद म्हणा, असे विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. सनातन संस्थेला दहशतवादी संबोधल्याने सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. बिनशर्त माफी मागण्याचीही मागणी केली.
Municipal Commissioner पुण्यात मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यात झालेला वाद आता चांगलाच टोकाला गेला आहे. बुधवारी आयुक्तांची बैठक चालू असताना शिंदे हे जबरदस्ती आत घुसले, आयुक्तांवर धावून आले, असा आरोप आयुक्तांनी केलाय. तर, तुमचं वर्तन गुंडाप्रमाणे आहे, असं आयुक्तांनी शिंदेंना सुनावलं असल्याचही बोललं जातंय. दुसरीकडे आयुक्त नवल किशोर राम हे शिंदेंना हिंदीत ‘तुम बाहर निकल जाओ’ असं म्हणाले. त्यामुळे या वादाला हिंदी मराठी वादाचीही किनार असल्याचं बोललं जातंय.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाज आक्रमक झाला होता. त्यांनी कबुतरखान्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली होती. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली होती. त्यानंतर आज देखील दादरमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज उच्च न्यायालयात झाली. यात न्यायालयाने आधी दिलेला आदेश कायम ठेवला आहे. इतकेच नाही तर आदेशाचे पालन केले जाईल, याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.
स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे मराठी नेते दिल्लीश्वरांसमोर झुकले; तिसऱ्या – चौथ्या रांगेत जाऊन बसले!!, हे राजकीय वास्तव चित्र काल राहुल गांधींच्या निवासस्थानी अधोरेखित झाले.
“मला वाकड्यात जायला लावू नका. सांगूनही ऐकले नाही, तर मोक्का लावल्याशिवाय राहणार नाही,” अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीडमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थेट इशारा दिला. बीड जिल्ह्याच्या बदनामीला कारणीभूत ठरणाऱ्या कोणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका मांडत, कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस गेली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या कुटुंबातील एका सदस्याला देखील ईडीची नोटीस गेलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या पक्षप्रवेशांवरही संभावना व्यक्त केल्या.
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर पडला नसून निवडणूक काळात भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करणार आणि गरजू व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांना सांगितले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App