मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मंत्रिमंडळाने धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 52,720 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
कल्याण पूर्व मधील मंगलराघो नगर परिसरात आज दुपारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली. सप्तशृंगी नावाच्या चार मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला आणि थेट तळमजल्यावर आदळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला नव्या पिढीतला “शोध” “थकला”; तो छगन भुजबळ यांच्यापाशीच येऊन थांबला!!, असे म्हणायची वेळ छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाने आणली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकच्या कुरापतींविरोधात विविध देशांत सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली होती. त्यानतंर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी पक्षीय राजकारण करण्याची काहीही गरज नसल्याचे ठणकावून सांगत संजय राऊतांना खडेबोल सुनावलेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथे ‘सन 2024-25 वर्षासाठीच्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व समित्यांचे एकत्रित उदघाटन’ संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘करिअर ट्रेनिंग प्रोग्राम’ अंतर्गत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय विदेश सेवेतील अधिकार्यांसमवेत (IFS) बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2013-14 तुकडीतील भारतीय विदेश सेवेतील 14 अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांनी एन्ट्री केली. धनंजय मुंडे यांच्याकडे खाते त्यांना देण्यात आले.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वारालगत आग लागल्याची घटना घडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्यस्तरीय बँकर्स समितीची 167वी बैठक’ संपन्न झाली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देशसेवेसाठी किंवा कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून तुरुंगात गेले नव्हते तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केला, म्हणून तुरुंगात गेले हाेते, असे हल्लाबाेल विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी राऊत यांच्यावर केला
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन हा नरेडकोचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. नरेडको संस्था विकासक, सरकार आणि ग्राहक अशा सर्वांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता सातत्याने काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे पदग्रहण केलेल्या, जेन नेक्स्ट आणि वुमन्स विंग या सर्वांचे अभिनंदन केले.
दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जाऊन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच शिवराज व त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
“बाल वाङ्मयाच्या” प्रकाशनात शरद पवारांची राजकीय फटकेबाजी; PMLA कायदा रद्द करून भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावाची तयारी!!, असा प्रसंग काल मुंबईत घडला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे खोटारड्या लोकांतील हिरो आहेत. शिवसेनेतील उठावापसून आजपर्यंत ते एकही वाक्य खरे बोलले नाहीत, अशी टीका सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे इव्हिनिंग वॉक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
भारतातील इसीस (ISIS) संलग्न दहशतवादी कारवायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठे यश मिळाले आहे.
अंदमानमधील ऐतिहासिक सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा ठाम निर्णय असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. सावरकरांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण करून भावी पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या या स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कारागृहात असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याचा गंभीर आरोप मत्स्य व बंदर विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. “तुरुंगात राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना शिव्या दिल्या, त्यांची लायकी काढली आणि हे सगळं इतर कैद्यांच्या समोर बो
भर उन्हाळ्यात एकमेकांना दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाब सुकले, पण ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळाच्या चरकातच अडकून पडले!!, अशी अवस्था उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या राजकीय ऐक्याची झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. भारताने त्वरित ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिले, मात्र हल्लेखोर दहशतवादी अजूनही फरार आहेत.
भटक्या विमुक्त समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे अखेर फडणवीस सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या एका प्रकरणात वांद्रे कोर्टाने गुरुवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना नोटीस बजावली आहे. यामुळे चव्हाण यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.
बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांसाठी नवा निर्देश जारी केला आहे. या नियमावलीनुसार, शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलिनीकरणाची मराठी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे, कारण ती स्वतःच शरद पवारांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जालन्यामध्ये एक वेगळेच वक्तव्य करून त्याला राजकीय राजकीय फोडणी दिली.
आता मी तिघे एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्यामध्ये कोणीही स्पीडब्रेकर आणू शकत नाही. कोणाला बुस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. मात्र स्पीड ब्रेकरला आता आमच्यात जागा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महामुंबई मेट्रो 9 चा चाचणी टप्पा आज पूर्ण झाला. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दाेन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले, वृत्तवाहिन्यांवर चर्चा झाली. साेशल मीडियावर अनेकांनी ज्ञान पाजळले. मात्र, अशा प्रकारची काेणतीही चर्चा नव्याने झालीच नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत केला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App