ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेच्या प्रमुख राज ठाकरे यांना चांगलेच अंगावर घेतले आहे. राज यांच्या विरोधातील तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांना सुधारायला सांगा असा सल्ला सदावर्ते यांनी धमकी देणाऱ्या कार्यकर्त्याला दिला.
मुंबईत ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच शरद पवारांनी घातला त्यांच्यात महाविकास आघाडीचा खोडा!!, असे आज बारामतीतून घडले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा महाराष्ट्राच्या राज्याचे वातावरणात रंगत असतानाच शरद पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे वक्तव्य शरद पवारांनी बारामतीत केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतली PDCC बँक रात्री 11.00 वाजता उघडली. त्यावरून काका – पुतण्यांमध्ये वाद उसळला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदास संजय राऊत यांनी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्यावर केलेला अघोरी पूजेचा आरोप सत्ताधारी शिवसेनेने जोरकसपणे फेटाळून लावला आहे. भरत गोगावले हे पूजापाठ करणारे आहेत. पण मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय आहे हे संजय राऊतांनी सांगावे. मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. या बाबाच्या सूचनेनुसार उद्धव ठाकरे यांचे सर्वकाही ठरते, असे शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
ठाकरे ब्रँडची खेचाखेची, पण इतरांच्या हातात जाऊच का दिली सत्तेची गुरुकिल्ली??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या भाषणांनी आज आणली.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनचे नेते संजय निरुपम यांनी मुंबईतील जोगेश्वरी येथे चांदीवाला एंटरप्रायझेसने केलेल्या दोन पुनर्विकास प्रकल्पांमध्ये ६६० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. यासोबतच संजय निरुपम यांनी मुंबईत गृहनिर्माण जिहाद चालवला जात असल्याचा आरोप केला आहे. चांदीवाला बिल्डरप्रमाणेच मुंबईतील इतर अनेक बिल्डर मराठी लोकांची घरे खरेदी करतात आणि ती मुस्लिम समुदायाला विकतात.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष आता आणखीनच चिघळला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी थेट शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नवा वाद पेटवला आहे.
शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजप मधला प्रवेश पक्षाच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी सुकर केला.
शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच ठाकरे ब्रँड विरुद्ध हिंदुत्व ब्रँड यांच्यातील लढाई मुंबईत आमने-सामने आल्याने एक राजकीय विसंगती समोर आली.
पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या सरकारच्या वादग्रस्त निर्णयाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी एक पाऊल मागे घेतले आहे. या प्रकरणी त्यांनी सद्यस्थितीत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणालेत.
आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) 3 भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असे ते म्हणालेत.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी -जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पद्मश्री सन्मानित, पर्यावरण आणि वन्यजीव लेखक ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक आणि माजी वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे आज 18 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. सोलापूरमधील त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय पर्यावरण आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही घडामोड अत्यंत लाभदायक ठरणार आहे, असे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवण्याबाबत अनिवार्य हा शब्द मागे घेण्यात आला आहे, परंतु सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारला सत्तेच्या वाट्यातला तुकडा म्हणून शरद पवारांनी परतीचा दोर कापला. ही राजकीय वस्तुस्थिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आली.
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कृषीसाठी AI धोरण मंजूर करण्यात आले. सोबतच आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली. इतकेच नाही तर ह्यात आता जोडीदारालाही मानधन मिळेल. तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पातील कंपनीला भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. त्यामुळे शरद पवार आता भारतीय जनता पक्षासोबत महायुतीमध्ये सामील होणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र या सर्व चर्चांना शरद पवार यांनी ब्रेक लावला आहे. संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणासोबतही युती करा, मात्र भारतीय जनता पक्षासोबत नाही, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या मंत्रिमंडळ बैठकीची सुरुवात अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर राज्यातील पावसाळी परिस्थितीचा आणि खरीप हंगामातील पेरणी प्रगतीचा आढावा घेण्यात आला
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा थंडावली आहे. मात्र उद्धव ठाकरेंची इज्जत निघून चालली आहे. मनसेसोबत आल्यावर इज्जत वाचेल अस त्यांना वाटत असेल. त्यामुळे ते मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.
दोन राष्ट्रवादींची होईचना एकी??, म्हणून शरद पवारांची तिसऱ्यांदा पलटी!!, असे चित्र आज पिंपरी चिंचवड मधून समोर आले. सध्याच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस केव्हाही एकत्र येऊ शकतात
देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील 635 गावांचा समावेश होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार हे महायुतीमध्ये असते तर आत्ता राष्ट्रपती झाले असते, असे वक्तव्य रामदास आठवलेंनी परत करून शरद पवारांच्या जुन्या जखमांवरल्या खपल्या पुन्हा एकदा काढल्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App