आपला महाराष्ट्र

Karate training

महिलांच्या आत्मरक्षणासाठी यवतमाळ पोलिसांचा पुढाकार; तब्बल 6000 हजार विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच महाराष्ट्रातले पोलीस वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतात. त्यामध्ये ते प्रामुख्याने महिला, मुले यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत असतात. महिलांच्या आत्मरक्षणासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे उदाहरण यवतमाळ मधून समोर आले. महिलांनी अत्याचाराच्या विरोधात आत्मविश्वासाने उभे राहावे. आत्मरक्षण करावे यासाठी पोलिसांनी तब्बल 6000 विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले.

Marathwada

मराठवाडा आणि अन्य भागातल्या कुठल्या धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग??, वाचा सविस्तर आकडेवारी आणि राहा सतर्क!!

मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

Siddhivinayak Temple

Siddhivinayak Temple : पूरग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिरा कडून दहा कोटी रुपये ची मदत

वृत्तसंस्था   मुंबई : Siddhivinayak Temple : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्याच्या अनेक भागांना पुराचा तडाखा बसला आहे. विशेषतः मराठवाडा आणि सोलापूरसह […]

Praful Patel

Praful Patel : प्रफुल्ल पटेलांचा ठाकरेंना सवाल- मुख्यमंत्री असताना तुम्ही किती मदत केली?

राज्यातील पूरस्थितीवरून राजकारण तापले असून, आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मदतीवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल्ल पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, ‘मुख्यमंत्री असताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीत किती मदत केली?’ असा सवाल केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यांच्या शैलीत प्रफुल्ल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrapur and Gadchiroli

विदर्भाच्या विकासाची मोठी घोडदौड; चंद्रपूर आणि गडचिरोली नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मूल, चंद्रपूर येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण संपन्न झाले.

Jalna district

अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील 10000 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, अतिवृष्टीग्रस्तांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे मोठे हाल झाले. अतिवृष्टीमुळे सगळी धरणे भरली. त्यांच्यातून अतिरिक्त विसर्ग करावा लागला.

CM Fadnavis

CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : वंचितची युतीसाठी तयारी, पण काँग्रेसचा प्रतिसाद नाही; प्रकाश आंबेडकरांचा सवाल- भाजपच्या दबावामुळे काँग्रेस सोबत येत नाही का?

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आपली तयारी असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, काँग्रेस आणि इतर कोणत्याही पक्षाने अद्याप युतीसाठी संपर्क साधलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला- युतीची चिंता करू नका, त्यांची गणितं आपल्याकडे, युतीत आत्मसन्मान महत्त्वाचा

आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. पालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी या मेळाव्यात व्यक्त केला.

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांची सरकारकडे मागणी- पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांसाठी ‘पुनरुज्जीवन आराखडा’ हवा

राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारने आपत्ती निवारणाची महत्त्वाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आवाहन केले आहे. त्यांनी नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा ठोस आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

BJP Retaliates

BJP Retaliates : मातोश्रीचे खिसे झटका, किमान 20 हजार कोटी शेतकऱ्यांना द्या; भाजपचा ठाकरे गटावर पलटवार

जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी वायफळ बडबड करून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मात्र लोकांचा सवाल आहे, हे संजय आहेत की ‘गांज्या’ राऊत? कारण रोज सकाळी त्यांची वागणूक गांजाच्या नशेतल्या माणसासारखी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने लोकांच्या पाठीशी उभे राहत असताना राऊतांचा राजकारणापुरताच मर्यादित विरोध केवळ नशेतली बडबड ठरत असल्याचे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

Ramtirth Godavari

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी महापुरात गेली वाहून; गोदावरी महाआरतीची उज्ज्वल परंपरा मात्र कायम!!

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातले असताना नाशिक मध्ये गंगा गोदावरीला आलेल्या महापुरात रामतीर्थ गोदाकाठी असलेली गोदाकुटी आज पूर्णपणे वाहून गेली. तरीही गोदावरी आरतीची उज्ज्वल परंपरा कायम राखण्याचा निर्धार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केला आहे. त्यानुसार आज सायंकाळी गोदा सेवकांनी गोदावरी महाआरती केली.

Marathwada and Solapur

मराठवाडा आणि सोलापूर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि त्यानंतरच्या मदतीची नेमकी आकडेवारी समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि सोलापूर जिल्हाधिकार्‍यांकडून सोलापूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतीची नेमकी आकडेवारी समोर आली. नागरिकांना मदत करताना अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहावे. केवळ नियम आणि कायद्यावर बोट ठेवून काम करू नये मदत करताना सरळ हात असावा अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सोलापुरात 4002 लोकांना पूरस्थितीतून वाचाविले; 6500 लोक मदत शिबिरांमध्ये दाखल; उद्यापासून आरोग्य शिबिरांचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्हाधिकार्‍यांकडून सोलापूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला.

मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत शिबिरांमध्येच थांबवा, सर्व सोयी सुविधा पुरवा; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे आठ जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्‍यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

Prakash Amte

जनसेवेतून आदिवासी जीवनमान उंचावणारे डॉ. प्रकाश आमटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धुळ्यात “या” पुरस्काराने सन्मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथे पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना ‘लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कारा’चे वितरण केले.

Maharashtra

Maharashtra : राज्यातील 31 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका; 37 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित, सरकारकडून आकडेवारी जाहीर

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, राज्य सरकारने नुकतीच नुकसानीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

devedra fadanvis

BSNL 4G नेटवर्कद्वारे गावोगावी कनेक्टिव्हिटी, डिजिटल क्रांतीला गती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारत संचार निगम लिमिटेडच्या स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचे उदघाटन (ऑनलाईन) संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

Jalgaon district

जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून दिली माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला

Chandrakant Patil

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला- मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या?

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे दिसत आहे. मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? असे नाव न घेत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सवाल केला आहे. तर महसूलमंत्री असताना पुण्यातील 342 कोटींचा भूखंड घोटाळा कसा दाबला गेला? अशी विचारणा जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत केली आहे.

CM Fadnavis

CM Fadnavis : महाराष्ट्रातील पूर स्थितीवर मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, पंतप्रधान मोदींकडे एनडीआरएफ अंतर्गत भरीव मदतीची मागणी

राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील सादर केला

Nitesh Rane

Nitesh Rane : नितेश राणे म्हणाले- आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार; मी काही पाकिस्तानमध्ये बसून नाही लिहिले

भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी ‘आय लव्ह महादेव’ अशी पोस्ट केली होती. त्यावर बोलताना राणे म्हणाले, एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव. हे सरळ स्पष्ट आहे. आमच्या हिंदू राष्ट्रांत आय लव्ह महादेवच चालणार. मी काही पाकिस्तान, कराची इस्लामाबादमध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेले नाही, असे राणेंनी म्हटले आहे.

Hasan Mushrif

Hasan Mushrif : मुश्रीफांचा महाडिक-क्षीरसागर यांना टोला; आम्ही लंडनवारीवर असताना मनपाच्या जागा वाटून घेतल्या

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले की, आम्ही लंडनवारीमध्ये असताना या दोन्ही नेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटून घेतल्या आहेत. एकाने 80 जागा घेतल्या तर दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या.

Sharad Pawar

Sharad Pawar : अतिवृष्टीने केवळ शेतकरीच नव्हे, तर बारा बलुतेदार बाधित; तातडीने उपाययोजना करण्याची शरद पवारांची मागणी

महाराष्ट्रात सध्या सर्वत्रच अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच पूर परिस्थितीमुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

Marathwada

Marathwada : नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिवला ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मराठवाड्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून नांदेड, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात