भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे गप्प बसले. त्यांच्या शिवसेनेची सगळी बाजू विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांभाळली.
दिशा सालियान हिचे आई-वडील यांनी काल पोलिस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या खूनामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्याची तक्रार दिली आहे, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत संविधानातील चर्चेत सहभागी होऊन आपले मत मांडले. यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे समाजात मोठे परिवर्तन झाल्याचे स्पष्ट केले. संविधानाला धोका नाहीये. धोका झाला होता, तो आता संपलेला आहे. पुढील निवडणुकांसाठी नवीन काही तरी मुद्दा काढा, नवीन नरेटीव्ह तयार करा, दुसऱ्या गोष्टींवर आपली ऊर्जा खर्च करावी,
एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘मिस्टर बिन’ म्हणून केला. ‘मिस्टर बिन’नी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती, पण आम्ही ती सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संविधान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावरून विरोधकांवर टीकेची झोडही उठवली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. दोन्ही सभागृहांत सध्या संविधानावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. या अधिवेशनात जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा घेण्यात आली. आता विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार 30 जून 2025 रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे ‘गारगाई धरण प्रकल्प’ यासंदर्भात आढावा बैठक आणि मौजे भांडूप, मुंबई येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, राज्यातील नागरिकांना किमान 5 किमीच्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत.
धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांचा “शाब्दिक खेळ” देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला आणीबाणीतला “गेम”!! आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधींचा आणीबाणीतला गेम उलगडून सांगितला. विधानसभेत संविधान गौरव या विषयावरच्या विशेष चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी संविधानाच्या विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख केलाच, पण त्याचबरोबर आज आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने बोंबा मारणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला.
“लाल संविधानी” कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विडंबनातून टार्गेट केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्याच्याविरुद्ध जोरदार मोर्चा उघडला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेल्यानंतर दोन्ही काका – पुतणे कधीतरी एक होतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विविध डिजिटल पोर्टल्सचे उदघाटन केले. महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MBOCW)च्या सेस पोर्टलचे तसेच कामगार विभागाच्या बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टीम (BMMS) आणि बॉयलर परीक्षांसाठी डिजिलॉकर सुविधेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसतानाही भास्कर जाधवांची विरोधी पक्षनेते पदासाठी घायकुती; तरी सरकारने त्यांच्या इच्छेवर फेरले पाणी!!, असे चित्र आज विधानसभेत दिसले.
ठाकरे आणि पवारांच्या लाडक्या पिढ्या; ड्रग्स आणि बदनामीच्या लफड्यात अडकल्या!!, असेच म्हणायची वेळ ठाकरे आणि पवारांच्या पुढच्या पिढ्यांच्या कर्तुतीतून एकाच दिवशी म्हणजे काल समोर आली.
मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. या प्रकरणाचे विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले असल्याचा मोठा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राज्यभरात चांगलाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
: दिशा सालियनच्या वडिलांनी आज मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचा ड्रगजच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे, यु.एस. – इंडिया बिझनेस कौन्सिल (यूएसआयबीसी) 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित, विशेष शिखर परिषदेला संबोधित केले. या शिखर परिषदेचा भाग असणे हा एक मोठा सन्मान असल्याचे, फडणवीस म्हणाले. तसेच गेल्या दशकात अमेरिका-भारत व्यावसायिक संबंध मजबूत करण्यात व आर्थिक वाढीसाठी अर्थपूर्ण आणि अनौपचारिक संवादांना चालना देण्यात, यूएसआयबीसीची महत्त्वाची भूमिका राहिली असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल काही चित्रपट कलाकारांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे समर्थन केले तर काहींनी त्यांना विरोध केला. अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना राणौत यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, विनोदाच्या नावाखाली एखाद्याची बदनामी करणे चुकीचे आहे. हे तेच लोक आहेत जे आयुष्यात काहीही करू शकले नाहीत.
हातामध्ये लाल संविधान घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विडंबनात्मक काव्यातून खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामराला पोलिसांनी समन्स पाठवले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणीमुळे विनोदी अभिनेता कुणाल कामरा सध्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. ताज्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कामराला आज म्हणजेच २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
फडणवीस सरकार मधले मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात पवारांच्या पक्षाचा हात असल्याचे आढळले
शिवसेना – भाजप युती तुटली, त्यावर दावे – प्रतिदावे; पण महाराष्ट्राच्या कौलाने नेमके कुणाला शिकवले धडे??, असा विचार करायची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्या – प्रतिदाव्यांनी आणली.
कुणाल कामराने विंडबन गीताद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली होती. या टीकेमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या सर्व वादावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाने विचारले, तर मी माफी मागेन अशी एका वाक्यात कुणालने प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे कुणालच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी “जिवंत सातबारा’ मोहीम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी होऊन वारसांच्या नावे सातबारा करण्याची मोहीम राबवण्यात येणार असून राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे महापारेषण प्रलंबित प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App